सातारा (एकनाथ थोरात) : तिर्थक्षेत्र चाफळ येथील सितामाईची यात्रा संक्रातीदिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरत असते, या यात्रेसाठी वसा घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून महिलावर्ग येत असतो. मकरसंक्रातीसाठी लागणारे सुगडी बनविण्याच्या कामाला चाफळ येथील कुंभारवाड्यात वेग आला आहे. मातीच्या सुगडी बरोबरच चिनी मातीच्या सुगडीला पसंती महिलावर्ग देत असतात. साधारण 2000 ते 2500 सुगड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती हणमंत कुंभार यांनी दै. ग्रामोध्दारशी बोलताना दिली.
परप्रांतीयाच्या आक्रमणामुळे कुंभार व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. पूर्वी शेतकरीवर्ग धान्याच्या मोबदल्यात बाप्पाच्या मुर्ती, सुगडी मडके सह मातीपासून तयार केलेली चुलही दिली जात होती. कुंभाराच्या व्यवसायातून प्रत्येक कुटुंबाचा परिताथ चालविला जात होता. हळू हळू या व्यवसायात परप्रांतियाचा शिरकाव होवू लागल्याने कुंभारकला टिकविणे जिकीरीचे जावू लागले आहे.
वारुळाची माती आणून ती साफ करुन या मातीची मळणी करुन यंत्राच्या सहय्याने सुगड्या बनविल्या जात आहेत. वारुळाच्या मातीमध्ये घोड्याची लिद, राखेचा वापर केला जातो. चिनी मातीही गरजेनसार विकत आणून या मातीपासून सुगडी केल्या जात आहेत. सुगड्यांना कलर दिला जातो. कुंभारकला टिकविण्यासाठी अनेक कुटुंबाचा प्रयत्न आजही पाहायला मिळत आहे. या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा प्रपंच चालविला जात असल्याचे हणमंत कुंभार यांनी सांगितले.
कुंभारवाड्यात 10 ते 15 कुटुंबे स्वतंत्र व्यवसाय करत आहेत. काही कुंभार कलावंतानी कमी जागेमुळे भाड्याने मिळेल ती जागा घेवून स्थलांतर करुन स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न केला आहे. चाफळ भागात छोटी मोठी 20 ते 25 वाड्या वस्त्या असून प्रत्येक गावात जावून सुगीला कुंभार कलावंत अन्नधान्य गोळा करीत असतात. मात्र कालांतराने थोडासा यात बदल होवून आता शेतकरीवर्ग रोख पैसे देवून त्या मोबदल्यात बप्पाच्या मुर्तीसह इतर वस्तूची देवाण घेवाण करत आहेत. हे मात्र निश्चित.
चाफळ येथील कुंभारवाड्यात सुगडी बनविण्याच्या कामाला वेग
RELATED ARTICLES