फलटण: लोकमान्य टिळकांनी समाजात एकता निर्माण व्हावी यासाठी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले लोकमान्यांनी या उत्सवाची सुरुवात केली तेव्हा त्यांचा उद्देश हा स्वातंत्र्यासाठी राष्ट्रजागृती हा होता आता गणेश मंडळांनी कृतिशील सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा उद्देश सफल करावा गणेश मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रांमध्ये मला सर्वात जास्त आवडलेला हा उपक्रम आहे
वाचन संस्कृती वाढावी त्यातून आपले विचार व संस्कार प्रगल्भ व्हावेत या उद्देशाने अभिनव महाराष्ट्र मंडळाने ठेवलेले हे पुस्तक प्रदर्शन खरोखरच वाखाणण्यासारखे आहे असे प्रतिपादन मलटण येथे अभिनव महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या पुस्तक प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी फलटणचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत बोलत होते
याप्रसंगी अभिनव महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाने वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी या उद्देशाने एक दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन फलटणचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक अशोकराव जाधव सामाजिक कार्यकर्त्या शोभा गणदास या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रकाश सावंत यांनी आपण स्वतः रोज पुस्तक वाचन करतो पोलिस सेवेत असूनही आपल्या घरात समृद्ध ग्रंथालय असल्याचे त्यांनी सांगितले पुस्तक वाचन माणूस विचारांनी समृद्ध होतो आपल्यातील जीवनमूल्याचा विकास होतो समाजाचे मत आपल्याला समजते त्यामुळे नियमित वाचन हा सर्वोत्तम संस्कार आहे.
या कार्यक्रमात बोलताना अभिनव महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळाच्या विधायक कृतिशील कामाचे कौतुक करत या मंडळाच्या सहाय्याने कायमस्वरूपी ग्रंथालय सुरू करू असे आश्वासन नगरसेवक अशोकरावजाधव यांनी दिले. सूत्रसंचालन आनंद वणवे यांनी केले तर मंडळाचे अध्यक्ष नितीन जगताप यांनी आभार मानले नागेश कापसे स्वागत केले.
यावेळी पञकार युवराज पवार ,विक्रम चोरमले जगन्नाथ कोरडे महादेव गायकवाड अशोक गुंजवटे संजय खोचे नागेश कापसे निखिल वायदंडे योगेश शिंदे सुदीप इंगळे गौरव इंगळे सुभाष इंगळे सुरेश जाधव प्रकाश गणदास राहुल कापसे इत्यादी उपस्थित होते.