सातारा : सातारा जिल्ह्यात 26 हजारापेक्षा जास्त सैनिक सैन्य दलात सेवा करुन निवृत्त झाले आहेत. तसेच स्वातंत्र्यनतर युध्दामध्ये आतापर्यंत 252 सैनिक शहीद झाले आहेत. जिल्ह्यातील 98 सैनिकांना शौर्य पदके मिळालेली आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबाचा सन्मान करण्यासाठी रविवार दि. 28 जानेवारी 2018 रोजी सैनिक स्कूल येथे सकाळी 10 वाजता मेळावा आयोजित केल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त ले. कर्नल राजेंद्र जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे बोलताना निवृत्त ले. कर्नल राजेंद्र जाधव म्हणाले, वेगवेगळ्या युध्द, चकमकीमध्ये शहीद झालेल्या जवानामध्ये स्वातंत्र्य पूर्वी 1941 ते 1948 इतर मोहिमेत 7 जवान, भारत – चीन 1962 च्या युध्दात 21 जवान शहिद, भारत-पाक 1965 मधील युध्दात 59 जवान शहीद झाले. युध्द मोहिम नागा होस्टालिटीमध्ये 8 जवान शहीद, भारत-पाक 1971 मध्ये जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन फॉल्कॉनमध्ये 1 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन अॅर्चिडमध्ये 2 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन रिनो 1 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन पवनमध्ये 11 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन मेघदूतमध्ये 11 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन विजयमध्ये 58 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन पराक्रमामध्ये 5 जवान शहीद, युध्द मोहिम ऑपरेशन रक्षकमध्ये 52 जवान शहीद झाले आहेत. सन 1999 नंतर शहीद झालेल्या शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान सत्कर होत आहे. मात्र 1999 पूर्वी शहीद कुटुंबियांचाही आतापर्यंत सातारा ल्ह्यितील एकूण 252 शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या सत्कार व सन्मान करण्याचा मानस आजही सातारकर ही संघटना व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होत आहे.