वाई : कवठे- केंजळ योजना पूर्ण होऊन देगाव पाझर तलाव व बंधारे भरून मिळावेत यासाठी देगाव ( ता. वाई) येथील पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष युवराज जनार्दन गोळे यांनी आत्मदहणाचा इशारा दिला आहे. देगांव येथील शेतकर्यांना भिषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पिके पाण्याविना जळून चालली आहेत. अनेक शेतकरी शेतीवरच अवलंबून असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात कवठे-केंजळ योजनेचे पाणी मागणीसाठी वाईतील धोम-बलकवडी विभागासमोर सोमवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांत योग्य तोडगा निघाला नाहीतर सोमवार दि.24 रोजी धोम- बलकवडी पाटबंधारे कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे लेखी निवेदन देगांव ग्रामस्थांनी पाटबंधारे खात्याला दिले आहे.
वाई तालुक्याच्या पूर्व भागातील देगांवसह 17 गावे गेली अनेक वर्षापासून धोम डाव्या कालव्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. पाण्याविना अनेक शेतकर्यांनी शेती सोडून मुंबई-पुण्याकडे नोकरीसाठी धाव घेतली आहे. पाणीटंचाईमुळे पिके करपल्याने शेतीमधून मिळणार्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जनावरांचे देखील अतोनात हाल होत आहेत. देगाव येथील अस्तित्वात असलेल्या कवठे-केंजळ उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून देगांव येथील पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष युवराज गोळे व त्यांचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, प्रांत, तहसीलदार व वाई येथील धोम-बलकवडी कार्यालयाकडे वेळोवेळी पाणी मिळवण्यासाठी लढा देत आहेत. मात्र शासन दरबारी त्यांच्या निवेदन व उपोषणांची कोठेही दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अखेर उपोषणास सारखे हत्यार उपसून त्यांनी सोमवार दि. 17 पासून वाई येथील धोम बलकवडी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. कवठे-केंजळ पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उपोषणाचा धस्का कार्यकारी अभियंत्यांनी घेऊन त्यांनी रजेवर जाणे पसंत केले या उपोषणाला प्रशासन न्याय देणार का.? असा प्रश्न सध्या तरी निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता गेल्या अनेक वर्षापासून देगांव ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा असणारागंभीर प्रश्न धोम-बलकवडीचे कार्यकारी अभियंता यांनी सोडवणे गरजेचे असताना देखील दीर्घ रजा काढून तो प्रश्न लोंबकळत ठेवला आहे. यावरूनच सिद्ध होते की देगांवच्या ग्रामस्थांना कवठे-केंजळ योजनेचे पाणी मिळू नये अशीच भावना दिसून येत आहे. जर शासनाने या उपोषणाचा विचार करून निर्णय न दिल्यास आम्ही कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष युवराज मुळे यांनी दिला आहे. दरम्यान उपोषण कर्त्यांची अनेक राजकीय नेत्यांनी भेट घेवून तालुक्यातील काही गावांतील ग्रामस्थांनी सुध्दा आपला पाठिंबा जाहीर केला आहे, यामध्ये महादेव मस्कर, गजानन बाबर, गजानन भोसले, यांनी भेट दिली आहे तर कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे पाटील व आमदार मकरंद पाटील हे भेट देवून त्यांची समस्या जाणून घेणार आहेत.
देगांव ग्रामस्थ करणार धोम पाटबंधारे कार्यालयासमोर आत्मदहन
RELATED ARTICLES