मायणी ःता.खटाव. जि.सातारा (सतीश डोंगरे)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धैर्यशील पाटील यांनी गेल्या 15दिवसांत सुमारे 4000 हून अधिक गरजू व गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूच्या किट स्वखर्चाने वाटप करत आहेत. अजून मागा, मी द्यायला समर्थ आहे, मी तुम्हाला मदत म्हणून नाही तर माझं कर्तव्य म्हणून देतोय हेच वाक्य या पाटलांच्या ओठावर आहे. कोणत्याही क्षेत्रातील माणूस पैशाने कितीही श्रीमंत असला तरी त्याची दानत हीच जगातील सर्वात मोठी संपत्ती असते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले गावचे धैर्यशील पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आहेत. पण पाटलांना मुळात या पदाचा सर्व नाही. त्यांना समाजसेवेत कधीच राजकारण केलं नाही, सध्याच्या कोरोना विषाणू परिस्थितीमुळे खटाव-माण तालुक्यातील ही जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. काही जण आपापल्या परीने गरीब जनतेला मदत करत आहेत. धैर्यशील पाटील यांच्या धीर देण्याने गरीब मात्र सुखावले आहेत. खटाव व माण तालुक्यतील अनेक ठिकाणी तळागाळात जाऊन त्यांनी भटक्या विमुक्त जमाती, इतर समाजातील गरजू व गरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करत आहेत. त्यांनी सर्व समाजातील गरीब कामगारांना मदत नाही तर कर्तव्य म्हणून या वस्तू दिल्या जात आहेत.
धैर्यशील पाटील यांच्या धीर देण्याने गरीब मात्र सुखावला ; मदत नाही हे तर माझे कर्तव्य
RELATED ARTICLES