पाटण :- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने योग्य निर्णय झाला नाहीतर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. मी येथे कुठल्या पक्षाचा अथवा जातीचा म्हणून आलो नाही तर भारताचा नागरिक म्हणून आलोय. पाटण येथे गेली ४८ दिवस मराठा समाजाचे चाललेले आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करीत असलो तरी पुढे येणाऱ्या न्यायदेवतेच्या निकालावरती आंदोलनाची पार्श्वभूमी राहील. इतर समाजाला जसा आरक्षणाचा न्याय मिळाला तसा मराठा समाजाला देखील मिळालाच पाहिजे असे खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटण येथे मराठा समाज ठिय्या आंदोलन ठिकाणी ठणकावून सांगितले.
छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले या राज्यातील आमदार – खासदार काय ब्रुसली आहेत का..? मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाहीतर निवडून दिलेल्या आमदार – खासदारांना खाली खेचा. त्यांना घरातून बाहेर निघून देवू नका असा इशारा देत उदयनराजे पुढे म्हणाले मराठा समाजाबरोबर इतर समाजातील आमदार – खासदारांना मराठा समाजाने देखील मतदान केले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. लोकांच्या मतावर व जिवावर तूम्ही सत्तेवर आलात. लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणे हि तुमची जबाबदारी आहे. नाहीतर तुम्हाला पदावर बसण्याचा अधिकार नाही. हा लढा आजून संपलेला नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालुच राहणार असे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी सांगितले.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेंद्र यादव, मदन कदम, यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन कर्ते व मराठा समाज समन्वयक पवन तिकुडवे, यशवंतराव जगताप, शंकर मोहिते, नितीन पिसाळ आदीनां छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पाणी देऊन पाटण तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाचे सुरु असलेले ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. तर पाटण चे तहसीलदार योगेश्वंर टोंपे यांना तसे निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजातील समन्वयक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाहीतर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही :- श्री. छ. खा. उदयनराजे भोसले.
RELATED ARTICLES