सातारा : गावागावामध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसुन येत आहे. विशेषत: यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या व इतर प्लॅस्टिक कचरासहित गटारे, ओढे, नाले, नद्या, तलाव व गावच्या परिसरात टाकलेले आढळते. यामुळे पाण्याचे स्त्रोत दुषित होणे तसेच माती व हवा ही प्रदुषित होत आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात व एकंदरीत त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हा परिषद साताराच्या वतीने दि. 28 डिसेंबरपासून गावपातळीवर प्लॅस्टिक संकलनास व ग्रामस्वच्छतेस प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमामध्ये घरगुती स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा करणे, प्रत्येक कुटुंबास गृह भेट करुन त्यांच्याकडील अनावश्यक प्लॅस्टिक संकलीत करुन त्याची सुयोग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी, ग्रामपंचायत क्षेत्राती संस्था, शाळा, अंगणवाडी महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, दवाखाने, शासकीय व अशासकीय कार्यालये, पटांगणे, मोकळ्या जागा, सार्वजनिक इमारती, परिसर, मंदीरे, रस्ते ओढे, नाले, नद्या इ. ठिकाणी विखुरलेले प्लॅस्टिक संकलीत करणे, ज्यांना घंटा गाडी नाहीत त्यांना घंटा गाडी घेण्यासाठी कर्ज देणे, शोष खड्यासाठी नरेगा निधीचे नियोजन करणे, तसेच दि. 28 डिसेंबर पासून ग्रामपंचायत क्षेत्रात प्लॅस्टिक बंदी घालण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्हा परिषदेचे पर्यावरणासाठी महत्वाचे पाऊल ; 28 डिसेंबर पासून गावपातळीवर प्लॅस्टिक संकलन उपक्रमास प्रारंभ
RELATED ARTICLES