कराड : कवितेला भावना व तीच्या शब्दांना रचना असावी लागते तरच कविता दर्जेदार बनते हे नव कवींनी ध्यानात घ्यावे असे प्रतिपादन दैनिक ग्रामोद्धारचे संपादक बापुसाहेब जाधव यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात क्रांती दलाच्या वतीने कविसंमेलन, आयोजित करण्यात आले होते तसेच संघटनेच्या वतीने देण्यात येणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना क्रांती पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी आ. विलासराव पाटील (उंडाळकर), पत्रकार, कवी विजय चोरमारे, कृषिमित्र अशोकराव थोरात जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, प्रा. मच्छिंद्र सकटे, कवी सुहास इनामदार, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
जाधव म्हणाले, क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. मधुकर माने हे समाजिक कार्यकर्ते आहेत.त्यांनी तरूणांच्या भावनांचा बांध फोडण्यासाठी कवीसंमेलनाचे आयोजन करून त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी हया व्यासपिठाची निर्मीती केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. माने डॉक्टर असले तरी ते व्यावसायिक नाहीत त्यांना समाज जीवनाचे भान आहे. आपल्या वैद्यकीय सेवेतून ते गोरगरिबांना नेहमी कमी मोबदल्यात वेळप्रसंगी मोफत सेवा देतात. हे त्यांचे गुण आजच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांनी अंगीकारले पाहिजेत. डॉ. माने यांच्या विचारांची समाजात अनेक मानसे आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांनी त्यांना पुरस्कार देण्याची ही कल्पना राबविली आहे. कोणाकडूनही पुरस्कार देण्यासाठी पैसा घेतलेला नाही त्यामुळे क्रांती दलाचे पुरस्कार स्वीकारणारे खर्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, कवितेत मोठी ताकद आहे. देश, जगभराच्या इतिहासात कवितेने मोठी क्रांती घडविली आहे. कवीता, राग, माया, प्रेम, तळमळ, रोमांस, क्रांती अशा अनेक प्रकारात मोडते. कवीता सुचणारा शोषिक असतो. त्यालाच कवीता सुचतात. जुन्या जाणत्या कवींच्या कविता आजही आजरामर आहेत. नवीन कवी तयार व्हायचे झाल्यास त्यांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपिठाची गरज आहे ती गरज डॉ. मधुकर माने यांनी या व्यासपिठाच्या माध्यमातून खुली केली आहे. माने डॉक्टर झाले असले तरी ते चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी गरीबीतून शिक्षण घेतले आहे त्यामुळे गरीबी काय असते ते त्यांना माहित आहे.
त्यामुळे ते वैद्यकीय व्यवसाय करताना प्रत्येक घटनेचे गांभीर्य लक्षात ठेऊन समाजाशी एकरूप होतात. पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, यापुर्वी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन एका व्यासपिठावर आपले विचार मांडायचे मात्र अलीकडे त्यांचे स्वरूप बदलू लागले आहे. प्रत्येक समाज आपल्या जातीचेच व्यासपिठ तयार करून तेवढयाच समाजाचे प्रबोधन करत आहे. ही काळाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे याचा प्रत्येक समाजातील घटकाने विचार करावा.
दरम्यान, यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब शेडगे, मजहर कागदी, किशोर आठवले, सतीश भोंगाळे, अॅड. रामराव जगदाळे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीदलाचे अध्यक्ष डॉ. मधुकर माने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नईम कागदी यांनी केले तर आभार आयुब इनामदार यांनी मानले. कार्यक्रमास आनंदा ननावरे, गंगाराम कुचेकर, किशोर धरपडे, दादा सावंत, साठे, बडेकर, सौ. माजगावकर यांच्यासह बहुसंख्य कवी, नागरीक उपस्थित होते.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात क्रांती दलाच्या वतीने कविसंमेलन, आयोजित करण्यात आले होते तसेच संघटनेच्या वतीने देण्यात येणार्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना क्रांती पुरस्काराने अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी आ. विलासराव पाटील (उंडाळकर), पत्रकार, कवी विजय चोरमारे, कृषिमित्र अशोकराव थोरात जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, प्रा. मच्छिंद्र सकटे, कवी सुहास इनामदार, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
जाधव म्हणाले, क्रांती दलाचे अध्यक्ष डॉ. मधुकर माने हे समाजिक कार्यकर्ते आहेत.त्यांनी तरूणांच्या भावनांचा बांध फोडण्यासाठी कवीसंमेलनाचे आयोजन करून त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी हया व्यासपिठाची निर्मीती केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. माने डॉक्टर असले तरी ते व्यावसायिक नाहीत त्यांना समाज जीवनाचे भान आहे. आपल्या वैद्यकीय सेवेतून ते गोरगरिबांना नेहमी कमी मोबदल्यात वेळप्रसंगी मोफत सेवा देतात. हे त्यांचे गुण आजच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्यांनी अंगीकारले पाहिजेत. डॉ. माने यांच्या विचारांची समाजात अनेक मानसे आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांनी त्यांना पुरस्कार देण्याची ही कल्पना राबविली आहे. कोणाकडूनही पुरस्कार देण्यासाठी पैसा घेतलेला नाही त्यामुळे क्रांती दलाचे पुरस्कार स्वीकारणारे खर्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
प्रा. मच्छिंद्र सकटे म्हणाले, कवितेत मोठी ताकद आहे. देश, जगभराच्या इतिहासात कवितेने मोठी क्रांती घडविली आहे. कवीता, राग, माया, प्रेम, तळमळ, रोमांस, क्रांती अशा अनेक प्रकारात मोडते. कवीता सुचणारा शोषिक असतो. त्यालाच कवीता सुचतात. जुन्या जाणत्या कवींच्या कविता आजही आजरामर आहेत. नवीन कवी तयार व्हायचे झाल्यास त्यांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपिठाची गरज आहे ती गरज डॉ. मधुकर माने यांनी या व्यासपिठाच्या माध्यमातून खुली केली आहे. माने डॉक्टर झाले असले तरी ते चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी गरीबीतून शिक्षण घेतले आहे त्यामुळे गरीबी काय असते ते त्यांना माहित आहे.
त्यामुळे ते वैद्यकीय व्यवसाय करताना प्रत्येक घटनेचे गांभीर्य लक्षात ठेऊन समाजाशी एकरूप होतात. पत्रकार विजय चोरमारे म्हणाले, यापुर्वी सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन एका व्यासपिठावर आपले विचार मांडायचे मात्र अलीकडे त्यांचे स्वरूप बदलू लागले आहे. प्रत्येक समाज आपल्या जातीचेच व्यासपिठ तयार करून तेवढयाच समाजाचे प्रबोधन करत आहे. ही काळाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे याचा प्रत्येक समाजातील घटकाने विचार करावा.
दरम्यान, यावेळी सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब शेडगे, मजहर कागदी, किशोर आठवले, सतीश भोंगाळे, अॅड. रामराव जगदाळे यांना विविध मान्यवरांच्या हस्ते क्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीदलाचे अध्यक्ष डॉ. मधुकर माने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नईम कागदी यांनी केले तर आभार आयुब इनामदार यांनी मानले. कार्यक्रमास आनंदा ननावरे, गंगाराम कुचेकर, किशोर धरपडे, दादा सावंत, साठे, बडेकर, सौ. माजगावकर यांच्यासह बहुसंख्य कवी, नागरीक उपस्थित होते.