म्हसवड : माण देशी फौंडेशन संचलित माणदेशी तरंग वाहिनी रेडिओ केंद्राच्यावतीने लोधवडे मधील ग्रामीण भागातील महिलांच्यासाठी गुरुवार दिनांक 14 मार्च 2019 रोजी सामुदायीक बैठकीचे आयोजन ग्राम सचीवालयात करण्यात आले होते.
बैठकीच्या सुरुवातीला लोधवडे गावच्या सरपंच सौ अपर्णा नष्टे यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत केले. मार्गदर्शन करतांना प्रमुख मार्गदर्शिका श्रीमती सारिका देशमुख यांनी बाल विवाह या विषयाला अनुसरुन आपली मते मांडली आपल्या समाजात अजूनही कौंटूबिंक आणि आर्थिक अडीअडचणी मुळे मुलींचे विवाह सोयीनुसार म्हणजे वयाचा विचार न करता उरकले जातात पण अशा कमी वयात मुलींचे लग्न शारीरीकदृष्ट्या पूर्ण अयोग्य असते कारण त्यांच्या शरीराची वाढ पुर्ण झालेली नसते जरी कायद्याने मुलीच्या लग्नाचे वय 18 वर्षे असले तरी आई वडील पालकांनी मुलींचे लग्न शिक्षण पुर्ण झालेनंतरच म्हणजे 21 वर्षानंतरच करावे असे स्पष्ट रित्या मांडले
उपस्थित महिलांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला.या कार्यक्रमात माणदेशी रेडिओच्या निवेदिका सौ लता जाधव यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत पालकांनी मुलींना शिकवावे पदवीधर करावे मुलींना व्यावसायीक शिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवूनच त्यांचे कन्यादान करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.उपस्थित महिलांनी युवतींना 21 वर्षानंतरच लग्न करण्याची प्रतिज्ञा करीत असतांना 18 वर्षापेक्षा कमी वय असाण-या सुनेला घरात घेणार नाही म्हणजे या विवाहाला आम्ही महिला होकार देणार नाघ्ही अशा स्वरुपाची शपथ घेतली या प्रसंगी पोषण पंधरवडा या शासकीय उपक्रमाची माहिती अंगणवाडी सेविका वर्षा जाधव आणि आशा सेविका मनिषा जगताप यांनी दिली माणदेशी रेडिओच्या या उपक्रमाचे महिलांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले. कु रोहिणी गाडेकर हिने उपस्थित महिलांचे पाहुण्यांचे आभार मानले.
मुलींचे लग्न लहान वयात करणे टाळा, 21 वर्षे झाल्यानंतरच कन्यादान करा:सारिका देशमुख
RELATED ARTICLES