पाटण:- ढेबेवाडी विभागातील करपेवाडी ता. पाटण जि. सातारा येथील बारावीतील विद्यार्थिनीचा घरापासुन काॅलेजच्या निम्या वाटेत गळा चिरून खून झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली. काॅलेज सुटल्यावर भाग्यश्री नेहमीच्या वेळेत घरी का आली नाही म्हणून तिचा घरच्यांनी शोध घेतला असता करपेवाडी ते तळमावले दरम्यान असलेल्या पाय वाटेत भाग्यश्रीचा मृतदेह गळा चिरलेल्या आवस्थेत आढळून आला. या घटनेचा पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भाग्यश्रीच्या मारेकरांचा शोध पोलिसांनी तात्काळ घेऊन त्याच्यावर कढक कारवाई करण्यात यावी अशी मागनी पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चाने शासनाला निवेदन देऊन केली आहे.
भाग्यश्री संतोष माने वय- १७ रा. करपेवाडी हि १२ वीतील विद्यार्थीनी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी काॅलेजला जाते, असे सांगून घरातून गेली. मात्र, काॅलेज सुटल्यानंतर नेहमीच्या वेळेत ती घरी परतली नाही. त्यानंतर घरच्यांनी व नातेवाईकांनी तिची सगळीकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. तिच्या मैत्रीणी, महाविद्यालय, संबधित आप्तेष्ट यांच्याकडे त्यांनी चौकशी केली आसता भाग्यश्रीचा शोध लागला नाही. ती ज्या मार्गाने जाते ती शेतातील पायवाट आहे. ती करपेवाडीतून थेट तळमावलेत येते. त्या मार्गावर भाग्यश्रीची आई व आजीने शोधाशोध सुरू केली असता. करपेवाडी नजीकच्या शेतातील रस्त्यात तिचा मृतदेह गळा चिरलेल्या आवस्थेत आढळुन आला.
कुटुंबियांनी या घटनेची त्वरीत माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. मात्र, तिच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी हा भाग्यश्रीवर घातपात असल्याचे बोलले जात आहे. माने कुटुंबिय मुळचे कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथील आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते करपेवाडीत स्थायिक आहेत. भाग्यश्रीवर झालेल्या या निघ्रुन घातपाताचा सर्व स्थरातुन निषेध व्यक्त करण्यात येत असुन. भाग्यश्रीच्या मारेकरांचा शोध पोलिसांनी त्वरीत लावावा अशी मागणी होत आहे. या घटनेचा पाटण येथे मराठा क्रांती मोर्चा कडून तीर्व निषेध व्यक्त करण्यात आला असुन. मारेकरांचा शोध त्वरीत लावावा व त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मराठा मोर्चा कडून करण्यात येत आहे. यावेळी तहसिलदार रामहरी भोसले यांना निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चंद्रहार निकम, गोरख नारकर, जयवंतराव सुर्वे, शंकर मोहिते, दिपक मांडवकर, अप्पा लुगडे, अधिक भिसे, आनंद देसाई आदी समन्वयक उपस्थित होते.