सातारा : सातारच्या प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत सत्ताधाछयांनी बहुमताच्या जोरावर नोकरभरतीचा घाट घातला असून त्यास आमचा पूर्ण विरोध आहे. पण तरीही नोकरभरती अटळच असल्यास ती रिझव्र्ह बँकेच्या बोर्डाकडूनच व्हावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असे बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील यांनी येथे आज भरगच्च पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही बँकेत सत्तेवर आलो तेव्हा बँकेचा नफा 16 कोटी होता. त्यावेळी अनावश्यक नोकरभरतीसारख्या गोष्टींना आळा घातला. यासारख्या उपाययोजनांमुळे बँकेच्या नफ्यात वर्षाला दोन कोटींनी वाढ झाली. सभासदांना दहा टक्के लाभांश दिला. कर्जावरील व्याजदर कमी केला, असे सांगून बलवंत पाटील म्हणाले, शिक्षक बँकेची कर्जवसुली पगारातून होते. त्यामुळे शंभर टक्के कर्जवसुली आहे. त्यामुळे वसुलीसाठी अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता नाही. शिवाय तंत्रज्ञानाच्या युगात नोकरभरतीची गरज नाही.
बहुमताच्या जोरावर संचालक मंडळाने चुकीचा निर्णय घेतला आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. पण तरीही नोकरभरती होणारच असेल, तर रिझव्र्ह बँकेच्या बोर्डामार्पैतच ती व्हावी यासाठी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, जिल्हा कार्याध्यक्ष विजय खांडके, जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सदस्य नवनाथ भरगुडे, पुणे विभागीय कोषाध्यक्ष रामभाऊ थोरात आदी उपस्थित होते.
सातारा शिक्षक बँकेतील नोकरभरतीस पूर्ण विरोध – बलवंत पाटील
RELATED ARTICLES