Friday, April 19, 2024
Homeठळक घडामोडीयेणारी निवडणूक तुम्हीच हातात घ्याः आ. पृथ्वीराज चव्हाण

येणारी निवडणूक तुम्हीच हातात घ्याः आ. पृथ्वीराज चव्हाण

कराडः साम, दाम, दंड व भेदनिती वापरून विरोधातील राजकीय पक्षच संपवण्याचा अणि कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची असा भाजप सरकारचा प्रयत्न सुरू आहे. बहुपक्षीय लोकशाहीला हे सरकार घातक ठरणार आहे. लोकशाही जिंवत ठेवायची असेल, तर येणारी निवडणूक तु्म्हीच हातात घ्या. असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.
आमदार श्री. चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोळे- विंग जिल्हा परिषद गटातील विंगसह विभागातील विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. त्यानंतर विंग (ता. कराड) येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. डॉ. इंद्रजीत मोहीते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील चिखलीकर, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, पैलवान नानासाहेब पाटील, शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, सदस्या नंदाताई यादव, कराड दक्षिण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव थोरात, सरपंच धनाजी पाटील, येरवळेचे सरपंच सुभाष पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे- पाटील, सयाजी यादव, पंचायत समिती सदस्या सौ. नंदाताई यादव, विलास पाटील, अनिल माळी, तानाजी घारे, अधिक गरुड, एल. जी. देसाइ, अशोक आणेकर, आप्पा पाटील यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते. आ. चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात चारशे ते पाचशे गड-किल्ले आहेत. विकासाच्या नावाखाली खाजगी लोकांनी हॅाटेल रिसॅार्टसाठी देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. राज्याला ऐतिहासिक अणि संस्कृतीचा वारसा असणारे हे किल्ले आहेत. संस्कृती नष्ट होण्याची भिती असून, किल्ले देण्याची वेळ सरकारवर का आली, असा सवाल उपस्थित करून चव्हाण पुढे म्हणाले. देशाची अणि राज्याची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यांच्याजवळ द्यायला पैसे नाहीत. रिझर्व बँकेतील पावणेदोन लाख कोटी रूपये काढले आहेत. सौभाग्यवतीच्या गळ्यातील दागिने विकून घर चालवायचे असा हा प्रकार आहे. यावर्षी बँकात 73 हजार कोटीचा घोटाळा झाला. याला जबाबदार कोण असा मुद्दा उपस्थीत करत अर्थव्यवस्थेचे वाटोळे मोदी सरकारने केले आहे, असा अरोपही त्यांनी केला. मोटारगाड्या निर्मिती कारखाने बंद रहात आहेत. साडेतीन लाख कामगार काढले आहेत. प्रचंड बेरोजगारी त्यामुळे वाढली आहे. धार्मिक दुव्रीकरण करून समोरचे राजकीय पक्ष संपवण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे. एकाच पक्षाच्या हातात सत्ता द्यायची की. बहुपक्षीय लोकशाही जिंवत ठेवायची याचा विचार आता तुम्ही करा. अशोक यादव यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत होगले यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular