सातारा (अजित जगताप) : संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या अयोध्या प्रकरणातील निकालानंतर सातारकरांच्या धार्मिक एकोप्याला अनेकांचा हातभार लागला आहे. सर्वांच्या स्वयं पूर्ण दक्षतेने शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखली गेली आहे.त्याचे राज्यभर कौतुक होत आहे.न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेत श्रीराम मंदिर व पर्यायी पाच एकर क्षेत्रात मशिद निर्माण करण्याचा निर्णय दिला आहे. सकाळी जलद प्रसार माध्यमाच्या मुळे हा निकाल समजताच त्याचे अनेकांनी स्वागत केले आहे.
हिंदू-मुस्लिम समाजातील ऐक्याचे प्रतीक म्हणून सातारचे सुपुत्र व कर सल्ल्यागार ,चित्रपट निर्मिते अरुण गोडबोले यांनी सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी राम-रहीम मराठी चित्रपट प्रदर्शित करून हिंदू-मुस्लिम भाईचारा अबाधित राखण्यास मदत केली होती. अनेकांनी त्याचे स्वागत केले होते. त्याच पद्धतीने आज शांतता कायम राखण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व समाज्याने स्वयं प्रेरणेने पुढाकार घेतला. ईद -इ-मिलाद व निकालाच्या पाश्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोशल मीडियावर सायबर सेलची करडी नजर ठेवून अफवा पसरवून धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी घेतली होती.देश पातळीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मुस्लिम समाजातील नेत्यांची गेल्या आठवड्यात बैठक झाली होती.अशी माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नव्वी यांनी यापूर्वीच दिली होती.
सातार्यात सामाजिक कार्यकर्ते अॅड.कॉम्रेड वसंत नलावडे, विजय मांडके, अस्लम तडसरकर यांनी भाईचारा टिकविण्यासाठी सातत्याने अनेक वर्षे विधायक उपक्रम राबविले होते. तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासह शेकडो सोशल मीडियावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोष्ट व्हायरल केली गेली होती. त्यामुळे या निकालाच्या अनुषंगाने अयोध्या प्रकरण संपले असून या निकालाचा सातारकरांनी सन्मान राखल्याबद्दल मान्यवरांनी आभार मानले आहेत. सातार्यातील सर्व सेवा व वाहतूक सुरळीतपणे चालू होती. धार्मिक स्थळी जाऊन सर्व जाती धर्माच्या बांधवांनी रितीरिवाज प्रमाणे प्रार्थना करून सर्वांच्या कल्याणाची अपेक्षा व्यक्त केली.हा जय -पराजय नसून भारतीय संविधानाचा विजय आहे. त्याचा आदर राखणे सर्व भारतीयांचे पहिले कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया सातारचे सुपुत्र व दलित सेना मुबंई प्रदेश अध्यक्ष प्रेमानंद जगताप,बँक अधिकारीसुजित शेख,भाजप शहर अध्यक्ष सुनिल काळेकर व मान्यवरांनी दिली आहे.
अयोध्या निकालानंतर सातारकरांच्या धार्मिक एकोप्याला अनेकांचा हातभार
RELATED ARTICLES