सातारा : खैरलांजी प्रकरणातील मूळ राजकीय सूत्रधार नाना पटोले यांना काँग्रेसने भंडार्यातून नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आयात केले आहे. विदर्भात काँग्रेसला उमेदवार मिळेनासे झाले आहेत त्यामुळे आम्हाला भाजपची बी टीम म्हणणार्याचांच काँग्रेस पक्ष भाजपची बी टीम आहे अशी राजकीय टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणं माने यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील श्रीमान हॉटेलमध्ये लक्ष्मण माने यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 29 सप्टेंबर 2006 रोजी महाराष्ट्रात खैरलांजी हत्याकांड घडले. याचे देशपातळीवर दूरगामी परिणाम झाले . घटनेनंतर सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर 2018 रोजी लागला. या हत्याकांडाचे एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे 20 जानेवारी 2017 रोजी निधन झाले. या खटल्यात अॅट्रॉसिटी दाखल न झाल्याने हे दलित हत्याकांड नसल्याचा निकाल भंडारा न्यायालयाने दिला.
या खटल्यात 11 पैकी 8 आरोपींवर सदोषं मनुष्यवधाचा गुन्हा दाखलं झाला होता. तीन आरोपींना पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या हत्याकांडाचा राजकीय आश्रयदाता नाना पटोले यांना विदर्भात अजिबातच उमेदवार न मिळणार्या काँग्रेसने भंडार्यातून आयात करून नागपुरातून नितीन गडकरी यांच्या विरोधात उभे केले आहे. म्हणजेच गडकरींना इलेक्शन सोपी जावी हाच मूळ हेतू असून वंचित बहुजन आघाडीपेक्षा काँग्रेसच भाजपची बी टीम आहे अशी टीका माने यांनी केली. वंचितने महाराष्ट्रात बावीस उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरीत सव्वीस उमेदवारांची यादी मुंबई येथे जाहीर करणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात वंचितच्या सर्व मेळाव्यांना एक लाखापेक्षा अधिक मतदारांचा प्रतिसाद मिळाला त्यामुळे कोणाशीही आघाडी न करणारी वंचित आघाडी किमान पंधरा खासदार निवडून आणेल असा ठाम विश्वास माने यांनी व्यक्त करत पटोलेंना नागपुरात सक्षम पर्याय देणार असल्याचे स्पष्ट केले .
आम्हाला भाजपची बी टीम म्हणणार्याचांच काँग्रेस पक्ष भाजपची बी टीम ; बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते लक्ष्मणं माने यांची टीका
RELATED ARTICLES