भुईंज : महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे भुईंज परिसरातील ग्रामस्थांचे, वाहनचालकांचे प्रचंड हाल होत असून ते दूर होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी युवा प्रतिष्ठानतर्फे रिलायन्सच्या अधिकार्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना अध्यक्ष सुधीर भोसले पाटील म्हणाले, महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामासाठी महामार्गालगत जमिनीखाली जलवाहिन्या तसेच केबल टाकण्यासाठी मोठे खोदकाम करण्यात आले होते. त्या खुदाईमुळे विशेषत: मालदेववाडी, चिंधवली, कारखाना, देगाव आणि भुईंज गावातून महामार्गाला जोडल्या जाणार्या रस्त्याची वाट लागली आहे. जलवाहिन्या आणि केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पुर्ववत करणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही.
रिलायन्सच्या कारभारामुळे जनतेचे हाल..
RELATED ARTICLES