नवी दिल्ली: वाहतूक अधिनियमन कायद्यातील सुधारणांना आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडल्यास यापुढे दहापट जास्त दंड भरावा लागणार आहे . वाहन चालक परवान्याशिवाय गाडी चालवताना आढळलात तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड , दारु पिऊन गाडी चालवताना आढळला तर 2 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांचा दंड, हेल्मेटशिवाय गाडी चालवली तर शंभर रुपये ऐवजी एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.