औंध: समाजात वाढत चाललेली अंधश्रध्दा, बुरसट कल्पना आचार विचार यांना तिलांजली देण्यासाठी औंध येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आगळीवेगळी, प्रदूषण मुक्त होळी साजरी करण्यात आली.
यावेळी कोरडा कचरा एकत्रित करून तसेच समाजातील व्यसनाधिनता नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, ज्योतिष कुंडली,केमीकल रंग, करणी भूत भानामती, नरबळी, मनूवाद, लिंगभेद, दहशतवाद याबाबी समाजातून हद्दपार व्हाव्यात यासाठी अशी माहिती लिहलेली प्रतिकात्मक
पत्रके पोस्टर्स यावेळी जाळण्यात आली व आगळीवेगळी होळी साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना श्रीपाद सुतार म्हणाले की,समाजातील बुरसटलेले विचार, अंधश्रद्धा, करणी थोतांडासारखे प्रकार नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची औंध शाखा मागील दोन वर्षापासून कार्यरत आहे. यापुढील काळात ही नरेंद्र दाभोळकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
यावेळी जयवंत खराडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच होळी लहान करा पोळी दान करा,विवेकाचा आवाज बुलंद करा, करणी भानामतीला गाडून द्या अंधश्रद्धेला तिलांजली या घोषणा युवक, मुलांनी दिल्या. यावेळी प्रशांत जाधव,बाळकृष्ण कुंभार, चंद्रकांत कदम, प्रशांत कुंभार, अरुण रणदिवे, प्रसाद गोसावी आदी मान्यवर, ग्रामस्थ, महिला जोतिर्लिंग गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
औंध येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने साजरी केली आगळी वेगळी होळी
RELATED ARTICLES