Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमी आज जो काही आहे तो तुषार भद्रे यांच्यामुळेचः अभिनेते उमेश जगताप

मी आज जो काही आहे तो तुषार भद्रे यांच्यामुळेचः अभिनेते उमेश जगताप

सातारा ः तुषार भद्रे सर हे माझे पाहिले गुरू आहेत, आणि त्यांच्यामुळेच मी आज जो काही आहे तो आहे. तुषार ज्या उमेदीने आणि उत्साहाने हे जे काही सगळं करतोय त्यासाठी माझ्या तुषार सरांना सदैव शुभेच्छा. सर मला कधीही हाक मारा मी तुमच्या सोबत आहे. असे उदगार सुप्रसिध्द अभिनेते व तुला पाहते रे फेम झेंेडे उर्फ उमेश जगताप यांनी काढले.
सातारा येथील एसबीएन साताराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त सातार्‍यामध्ये तुषार भद्रे स्कूल ऑफ थिएटर अ‍ॅण्ड फिल्म आर्टच्या वतीने आर्ट फ्युझन फेस्टीव्हलच्या सांगता सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणून उमेश जगताप बोलत होते. हा महोत्सव गेली सात दिवस शाहू कला मंदिर सातारा येथे संपन्न झाला.
सांगता सेाहळयाची सुरूवात सातारचे लोकप्रिय खा.स्व.लक्ष्मणराव पाटील यांना उपस्थित सर्वानी श्रध्दांजली वाहून झाली. त्यानंतर आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना तुषार भद्रे म्हणाले की, सातारचा सांस्कृतिक पर्यावरणाला समृद्ध करणार्‍या या महोत्सवात नाट्य-चित्र-शिल्प-साहित्य याचा एकत्रित असा आविष्कार सादर होत आहे. कलेला प्रोत्साहन मिळावे अधिकाअधिक रसिक प्रेक्षक वाढावेत व नवनवीन कलाकार निर्माण व्हावेत, कला लोकांपर्यंत पोहचावी हाच या उपक्रमाचा उद्देश आहे. आज जे उभरते कलाकार आहेत ते उद्या व्यावसायिक कलाकार बनतील याचे आपण साक्षीदार होवूयात. म्हणूनच श्‍वासात श्‍वास असेंपर्यत मी रंगकर्मी म्हणून काम करतच राहणार आहे. सर्व प्रायोजक,सातारकर रसिक यांच्या मुळेच महोत्सव यशस्वी झाला, मी शेवटच्या श्वासा पर्यन्त कलाकार घडवतच राहणार आहे.तसेच सागरनाथ गायकवाड, राजन कुंभार व प्राचार्य धुमाळ सर यांचे सहकार्य ही सुद्धा माझी ऊर्जा आहे.
यावेळी महोत्सवाच्या वतीने र्‍हास पर्व या दोन अंकी नाटकाचे कलाकार विद्यासागर पाठक, संजय हर्डीकर, रविदर्शन कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण,शिंगवादक 82 वर्षीय उध्दव गुरव आदींचा सत्कार तुषार भद्रे यांनी केला. त्यानंतर सातारचे ज्येष्ठ रंगकर्मी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील पेशवे मोरोपंत पिंगळे ही भूमिका साकारणारे नंदू पाटील यांना सातारा नाटयगौरव पुरस्कार अभिनेते उमेश जगताप यांचे हस्ते तर सातारचे ज्येष्ठ लेखक सिनेदिग्दर्शक पटकथाकार, नाटककार दिलीप आंबेकर यांना जीवनगौरव पुरस्कार तुषार भद्रे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.भरजरी फेटा, स्मृतीचिन्ह व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सौ.विजया पाटील, मंगला आंबेकर, हेमांगी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.या पुरस्कारासाठी पुरस्कार विजेत्यांची निवड मधू खल्ले, राजू मुळे, सुजीत शेख, रवि डांगे व हेमांगी जोशी यांनी केली होती.
सत्काराला उत्तर देताना दिलीप आंबेकर म्हणाले, माझी चित्रपट कारकीर्द सुरू व्हायला माझी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काहीतरी नवीन शोधण्याची वृत्ती कारणीभूत आहे असं मला वाटतं. मी त्या काळात कॅमेरा कॅमेरा खेळायचो आणि त्या काळातल्या ह्या माझ्या खेळला ज्यांनी प्रामुख्याने बळ दिलं त्यात मी तुषारच नाव प्रामुख्याने घेईन सोबतच रवींद्र डांगे, सयाजी शिंदे या मंडळींनी जी साथ आणि प्रोत्साहन दिलं म्हणून मी आजवरचा प्रवास करू शकलो. आणि तुषारनी जीवन गौरव दिला म्हणून मी थांबणार नाही आहे तर उलट आणखी उमेदीने शेवटच्या श्वासापर्यंत मी या क्षेत्रात कार्यरत राहीन.
अभिनेते नंदू पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्यासाठी हा पुरस्कार मानाचा आहे. माझं कला क्षेत्रातलं योगदान उत्तम असावं असं मीच छातीठोकपणे सांगतो. कारण ज्या काळात मी उमेदवारी करत होतो त्याचकाळात माझा मित्र जरी असला तरी प्रतिस्पर्धक असलेल्या तुषार भद्रे यानी आज माझी पुरस्कारासाठी निवड केली हे याचच द्योतक आहे. तुषार नेहमीच माझा मार्गदर्शक मित्र होता आणि राहील. मी सातरचा सदैव ऋणी आहे आणि राहीन कारण जी काही माझी जडण घडण झालीय ती इथेच झालीय. पुढच्या प्रवासात मी फक्त काम करत राहिलो, आणि आज जो आहे तो तुमच्या समोर आहे. सातारकरांकडून झालेल्या या घरच्या सत्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे मी पुढील काळात ही तुमच्या अपेक्षेला नक्की खरा ठरेल याची मी ग्वाही देतो.
महोत्सवामध्ये मागील सात दिवसात शीर्षकांच्या शोधात या आगळयावेगळया कार्यक्रमात अकादमीच्या प्रथमच स्टेजवर आलेल्या उमेदवार कलाकारांनी आगळावेगळा प्रयोग सादर केला.त्यानंतर गजर, नेकलेस व रेनमेकर या एकांकिका सादर झाल्या. तर प्रा.दिलीप जगताप लिखीत गस्त हे दोन अंकी नाटक मुंबईच्या अभिनय कल्याण या संस्थेच्या 28 कलाकारांनी सादर केले. अमित ढाणे, अमोल वाघमोडे, सोमनाथ गावठे, मंगेश शेवते या नामवंत चित्रकारांनी पोट्रेट, लॅन्डस्केप, कॅलीग्राङ्गी यांची प्रात्यक्षिके सादर केली.
सातारचे संजय कुंभार, संदीप निकम, रवी कुंभार यांनी तीन शिल्पकलेची प्रात्यक्षिके सादर केली. अभिरुची कोल्हापूर निर्मित 2 अंकी नाटक कॅलिगुला हे सादर झाले. तसेच रंगभूषाकार कुमार भुरके, व प्रशांत इंगवले यांनी रंगभूषा-वेशभूषा यांची प्रात्यक्षिके सादर केली. आणि हापूस क्रिएशन निर्मित लोककथा 78 हे रत्नाकर मतकरी लिखित संदिंप जंगम दिग्दर्शित दोन अंकी नाटकाचा प्रयोग अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर एका धोतराची गोष्ट व आहे मनोहर तरी.. हा पु. ल. देशपांडे यांचेवरील दिर्घांक वर्षा वैद्य यांनी सादर केला.
सांगता सोहळयापूर्वी कोल्हापुर येथील परिवर्तन कला केंदाचे कलाकार र्हास पर्व हे 2 अंकी नाटक सादर झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमांगी जोशी यांनी केले. सांगता सोहळयास सिने, नाटय, दूरदर्शन क्षेत्रातील अनेक नामांकित अभिनेते, अभिनेत्री, स्थानिक कलाकार यांची मोठी उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular