सातारा ः छत्रपती शिवरायांचे थेट वशंज श्री. छ. उदयनराजे भोसले यांचा आदरयुक्त दरारा अनेकांनी पाहिला आहे. त्यांची प्रतिमा व त्यांच्या डोळ्यातील भाव अनेकांना चुका कबुल करण्यास भाग पाडतात. परंतु शेवटी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे सुद्धा आपल्या सारखेच सर्व सामान्य आहेत. सातारा शहरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करणार्या गरीब भगिनीसाठी सुद्धा जेव्हा खासदार हातातील राखी पाहून डोळ्यात अश्रु उभे करतात. त्यावेळी त्यांच्या ह्दयातील मायेचा महासागर अनेकांना ओलाचिंब करून टाकतो.आज लोकसभा निवडणुकीच्या काळात खा. श्री. छ. भोसले यांच्या प्रचारासाठी गरीब बहिणीने खारु ताई चा वाटा उचलला आहे.
याबाबत माहिती अशी की, 38 वर्षापर्वूी सुनंदा सोपान वाहोत्रे, या पसरणी, ता. वाई युवतीचे सासवड येथील प्रभाकर एक्के यांच्याशी अगदी साध्या पद्धतीने विवाह झाला होता. पतीच्या मोलमजुरी व्यतिरिक्त कोणतेही आर्थिक साधन नसल्यामुळे गरीबीचे चटके असह्य झाले होते. अशा वेळी आपल्या संसार वेली वर तीन फुले उमलली, त्यामुळे पतीच्या सोबत आपण ही हातभार लावावा. अशी मनाशी खूण गाठ बांधून सातारा शहरात 1992 साली
खानावळ सुरू केली. सुरूवातीला घर संसार चालवण्या इतके पैसे मिळू लागले. परंतू लहान मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी खणावळ ऐवजी सदर बाझार येथील ऑफिसर क्लबच्या शेजारी एक छोटीशी चहाची टपरी टाकली. या ठिकाणी तीन लहान मुले सुद्धा येत होती. सुनंदा यांच्या माणूसकीच्या स्वभावामुळे सदर बाझार परिसरातील झोपडपट्टीतून सातारा शहरात शाळेसाठी ये-जा करणार्या लहान मुलांना मोफत खाऊ देवून त्यांनी आपल्या कमाईचा काही वाटा सामाजिक जबाबदारी म्हणून स्विकारली आहे. आज त्यावेळची काही लहान मुल खूप मोठी होऊन, परदेशातही उच्च पदावर केले आहे. तसेच मुलीचा विवाह, मुलांचे शिक्षण, छोटेसे घर हे स्वप्ने देखील साकार झाले.
या सुनंदा एक्के महिलेची धडपड पाहून, एक दिवस चक्क श्री. छ. उदयनराजे भोसले हे आपल्या गाडीतून खाली उतरून नम्रपणाने म्हणाले, मावशी गरम पोहे मिळतील का? हे शब्द कानात ऐकल्यानंतर मला खूप नवल वाटले. मी त्यांच्यासाठी पोहे बनवून दिले. एका साध्या टपरीत छत्रपतींचे वंशज येऊन, पोहे मागतात हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. त्यांनी पोहे खाल्यानंतर पैसे देण्यासाठी नोटा काढल्या, पण मी त्यांना नमस्कार केला. त्यावेळी त्यांनी मावशी, मी पुन्हा याठिकाणी आल नाही पाहिजे, म्हणून पैसे घेत नाही का? असा प्रती प्रश्न करून, मला पैसे घेण्यासाठी भाग पाडले. त्यानंतर अनेकदा पोहे, वडापाव, चहा एवढच नव्हे तर, मी घरातून आणलेल्या भाजी-भाकरीचा ही त्यांनी आस्वाद घेत आहेत.
राखी बंधनच्या दिवशी अचानक खासदार श्री. छ. भोसले हे टपरी जवळ आले, आणि म्हणाले आज काय आहे? मी सहज म्हणाले, महाराज पोहे करते, थांबा ! त्यानंतर राखी बंधन आहे. हे मी सांगताच महाराजांनी हात पुढे केला, आणि मी त्यांना राखी बांधली. त्यावेळी त्यांच्यातील अल्लड वृती आणि क्षणात डोळ्यातून येणारे अश्रू आज ही मला त्यांच्यातील माणूसकीचे दर्शन घडवितात. एका करारी, राजबिंड राजाच्या डोळयात अश्रू पाहून मला त्या हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाची ताकद कळाली आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा ही छत्रपतींच्या वंशजाच्या हातात मी बांधलेली राखी, सोन्याच्या कड्यापेक्षाही त्यांना मौल्यवान वाटत होती. त्यामुळे दरवर्षी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले हे माझ्यासाठी राखी बंधनची खरी ओवाळणी आहे. दरवेळेला कोणी त्रास देत का? काय अडचण आहे का? काय मदत पाहिजे का? असे विचारून त्याठिकाणी उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनीं, ग्राहक यांना पाहून या मावशीकडे लक्ष ठेवा, पैसे बुडवू नका, असे एका वाक्यातच आदेश देतात. त्यामुळे आजपर्यंत माझ्या चहाच्या टपरीवर एक रूपयाही बुडविण्याची कोणी धाडस करीत नाहीत. अशा या छत्रपती उदयनराजेंसाठी मी माझ्या पद्धतीने भावाला मताधिक्य मिळावे यासाठी प्रार्थना करीत आहे. कारण माझा राजा, पुन्हा माझ्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. याचा मला विश्वास असल्याची माहिती सुनंदा एक्के यांनी दिली आहे.
खा.श्री. छ.उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी गरीब बहिणीने उचलला खारुताईचा वाटा
RELATED ARTICLES