कराड ः लाटांवर स्वार होऊन मतदान करण्याचे दिवस गेले आहेत. आता लोक विकास करणार्यांना मते देतात. त्यामुळे भाजपची स्थिती स्ट्राँग आहे. भाजपाला जास्तीत जास्त मतदान करून दोन तृतीयांश बहुमत मिळावे यासाठी बाहेर पडा, असे आव्हान महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी मंत्री पाटील यांनी आज शहरातील व्यापार्यांसह नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे, सहकार राज्यमंत्री शेखर चरेगावकर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, उमेदवार नरेंद्र पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, काश्मीरचा प्रश्न असो अथवा राम मंदिरा सारखा प्रश्न असो ते सोडवायचे आहेत. त्यासाठी जोरात कामाला लागण्यासाठी भाजपाला जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे, असे प्रत्येक शहरातील गावातील लोकांनी प्रयत्न करा भाजपाला केंद्रात दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास काश्मिर सह राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागू शकतो. भाजपाला मानणार्या प्रत्येकाने त्यासाठी प्रयत्न करावेत आपण मतदान कराच मात्र आपल्या शिवाय रोज दहा लोकांना भाजपाला मतदान करण्याचा सल्ला द्या. त्यामुळे भाजपचा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊ शकतो. ती सगळी स्थिती देशातील स्थिती बदलू शकते. आता लाटांवर किंवा भावनांवर मत देण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे विकास केला तर लोक तुमच्या सोबत राहणार आहेत. यावेळी नरेंद्र पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
व्यापार्यांशी संवाद
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यापार्यांशी संवाद साधण्यापूर्वी कोयना वसाहत येथेही भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यांनी लोकांना भाजप सोबत येण्याचे आव्हान केले. त्यानंतर त्यांनी करपे हॉलमध्ये ते थेट व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला त्यांनी शनिवार पेठेतील छाजेड कुटुंबीयांची भेट घेतली.
भाजपाला बहुमत मिळण्यासाठी बाहेर पडा ः ना. चंद्रकांतदादा पाटील
RELATED ARTICLES