कातरखटावः अजिंक्य साळुखे-बोडके हे सतत दुष्काळी असणा-या खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे सुपुत्र. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य कुटुबात झाला. प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कातरखटाव व रायगड मिलिटरी स्कुल रायगड येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण एच.पी. विद्यालय वडूज येथे झाले. त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यासासाठी त्यांनी सातारा येथिल रयत शिक्षण संस्थेचे इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज येथून एलएलबी पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे येथिल आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एलएलएम पदवी प्राप्त केली. तसेच त्यांनी इन्फोसिस सारख्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत काही काळ नोकरी केली.
राष्ट्रीय पातळीवरती मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, बेंगलोर या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्यक्रमास वर्णी लावली. तसेच राज्यपातळीवरती सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, पुणे, चिपळून, अहमदनगर, औरंगाबाद आदी ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केले.
तसेच समाजसेवा हीच खरी इश्वरसेवा होय या उक्तीस मानणारे अजिंक्य साळुखे बोडके यांनी अतिशय कमी काळात एक उत्तम समाजसेवक व धडाडीचा कार्यकर्ता म्हणून नावलौकीक मिळविलेला आहे. एका सर्वसामान्य कुटुबातील व्यक्ती तरुण तडपदार, आभ्यासू दुरदृष्टी असणारे व ग्रामीण विकासाबाबत सतत जागरुक असणारे व्यक्तीमत्व, व तसेच कातरखटाव ग्रामीण विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. तरुणवर्गात त्यांच्या धडाडीबाजीची क्रेज आहे. सतत मित्रांच्या गराडयात असणारे ङ अजिंक्य साळुंखे-बोडके हे कुस्ती असो वा कब्बडी असो अथवा हॉलिबॉल असो वा क्रिकेट असो ते नेहमीच हिरीरीने भाग घेत असतात. या खेळांच्या स्पर्धेचे आयोजनही ते चांगल्या प्रकारे पार पाडतात. कला करमणुक व सांस्कृतीक कार्यक्रमांची आवड असलेने विविध कार्यक्रमांचे आयोजनही त्यांच्याकडून केले जाते. अन्यायाविरुदृध सतत लढा पुकारणारे व सर्व जाती समभाव चा जागर करणारे ते बहुचर्चीत समाजसेवक आहेत. एक उत्तम वक्ता व धडाडीचा कार्यकर्ता असल्याकारणाने राजकारणात त्यांची वेगळीच छाप आहे. असे ड साळुंखे-बोडके हे व्यवसायाने वकील आहेत. तसेच ते उत्तम शेतकरीही आहेत. सध्याच्या काळात ते युवा उद्योजक म्हणून नावारुपास येत आहेत.
कातरखटाव नगरीत व परीसरात त्यांना वृक्षक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. कारण प्रत्येकवर्षी ते स्वता दोनहजार वृक्षांची लागवड करतात. दुष्काळी परस्थितीमध्ये झाडांना टॅन्करणे पाणी घालतात. झाडांना खत घालने, औषध फवारणे आदी कामे ते करत असतात. गेल्या काही दिवसापुर्वी त्यांना आरोग्यदुत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. कारण त्यांनी आरोग्य जागृती रॅली, आरोग्य तपासणी शिबीर, पावसाळयात पावडर फवारणी तसेच सोशल ट्रस्टच्या माध्यमातून निम्म्या खर्चात शस्त्र क्रिया करुन दिल्या. एवढेच नाही तर खेळ व क्रिडा क्षेत्रातील दर्दी मानुस म्हणून नावलौकीक मिळविला. कारण ते वकील असूनही ते उत्तम पैलवान आहेत. त्यांनी स्वखर्चाने गावात तालीम उभारली आहे. तसेच युवक वर्गासाठी फिटणेस जीम उभारली आहे. ते विविध खेळोच्या स्पर्धाही भरवितात. लोक त्यांना कला करमणुक व सांस्कृतीक कार्यक्रमाचा मानबिंदूही समजतात. कारण त्यांनी स्वखर्चाने डान्स फेस्टीव्हल, दहीहंडी दांडीया गणेशोत्सव या सारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच बालपणीच्या काळात गणेशोत्सवातील पथनाटयातुन मोठयाप्रमाणत जनजागृती केली आहे. तसेच राजकरणामध्ये त्यांनी अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी आपल्या कर्तत्वाचा ठसा उमठिविला आहे. उत्कृष्ठ वक्ता, संयोजक व धडाडीचा कार्यकर्ता युवापिढीचा आधारस्तंभ म्हणुन नावलौकीक मिळविला आहे. त्यांनी ग्रामपंचायत, पंचायत समीती, जिल्हापरीषद, आमदारकी व खासदारकी आदी निवडणुकामध्ये आपल्या कर्तृत्वाची चुनुक दाखविली आहे.
खटाव-माणचे अजिंक्य साळुंखे-बोडके यांचे मताधिक्य निर्णायक ठरणार
RELATED ARTICLES