Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीमाणदेशी चारा छावणीला पूर्ण सहकार्य करणार: ना. चंद्रकांतदादा पाटील

माणदेशी चारा छावणीला पूर्ण सहकार्य करणार: ना. चंद्रकांतदादा पाटील

म्हसवड : मुक्या जनावरांना आतापर्यंत उत्तम प्रकारे संभाळलेल्या व जनावरांच्या चार्‍याची व पाण्याची चांगल्याप्रकारे सोय करून शेतकार्‍याना दिलासा देणार्‍या माणदेशीची जनावरांची चारा छावणीचा शासकीय योजनेत समावेश करून जोपर्यंत सुरू ही चारा छावणी असेल तो पर्यंत पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे महसूल व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.
माणदेशी फौंडेशनच्या वतीने म्हसवड येथील चारा छावणीमध्ये आयोजित कार्यक्रमात राज्याचे महसूल व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील बोलत होत्र. यावेळी यावेळी महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे राज्यमंत्री ना.शेखर चरेगावकर, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकार, माण देशी बँक व माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, सामाजिक कार्यकर्ते व छावणी चालक विजय सिन्हा, प्रा.विश्वंभर बाबर, माण देशीच्या कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, छावणी व्यवस्थापक रवींद्र वीरकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
माणदेशी फौंडेशनने एक जानेवारी 2019 रोजी म्हसवड येथील मेघासिटी येथे जनावरांची छावणी सुरू केली.राज्यातील ही पहिलीच चारा छावणी होती.शिवाय या चारा छावणीत चारा,पेंड,पाणी आदी सुविधा चांगल्या पद्धतीने दिल्या जात असल्याचा यापूर्वीचा अनुभव असल्याने छावणीतील जनावरांची संख्या 10 हजार पेक्षा जास्त झाली.नंतर शासकीय छावण्या सुरू झाल्याने ही संख्या आता 8 हजारांवर आली आहे.परंतु दिवसेंदिवस पाणी कमी पडू लागल्याने छावणी बंद करण्याचा विचार छावणी चालक विजय सिन्हा करू लागले.यासंदर्भात राज्याचे महसूल व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांना समजताच छावणी बंद करू नये,आपण त्यावर चर्चा करून मार्ग काढू असे चंद्रकांतदादा यांनी सांगितले होते.व त्याच साठी म्हसवड येथील छावणीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते,
यावेळी ना. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले दुःकाळावर आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासनाच्या वतीने करण्यात येत आहेत.म्हसवड येथे सुरू असलेली चारा छावणीचा समावेश सरकारी चारा छावणीत करण्यात येईल तसेच छावणीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यात येतिल असे सांगून ते पुढे म्हणाले राज्यातील 28000 गावे दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.तसेच 151 तालुक्यांना केंद्राने 4700 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.तसेच हा निधी येण्यास वेळ लागणार असल्याने राज्य सरकारने अकस्मिता निधीतून हेक्टरी 6500 प्रमाणे तर बागायती क्षेत्रास 13000 फळबाग असल्यास हेक्टरी 18000 प्रमाणे रक्कम 67 लाख शेतकर्‍याच्या खात्यात जमा केले आहेत,उर्वरित शेतकर्‍याच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे.
हा प्रश्न सुटतो आहे तोपर्यंत चारा छावणींचा प्रश्न पुढे आला.याबाबतीतही शासनाचे धोरण सकारात्मक असून मागेल त्यास चार छावणी देण्यात येत असून राज्यात 1300 छावण्यांमधून सुमारे 8 लाख 50 हजार जनावरे आहेत तर माण-खताव्या दोन तालुक्यात 19 छावण्या सुरू असून यामध्ये 11940 जनावरे आहेत.छावणीतील जनावरांसाठी असणारी रक्कम या सरकारणे 40 रुपयांवरून 90रुपये केली असून ही रक्कमही वाढविण्यात येणार आहेत.
माण देशी च्या सर्व कार्याची स्तुती करून ते म्हणाले माण व खटाव मधील महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महिलांचे आरोग्य,रोजगार व मुलींचे शिक्षण या संदर्भातील आराखडा तयार करावा ज्यामध्ये महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक ते घटक पुरविणे,मुलींना चांगले शिक्षण घेण्यासाठी तसेच खेळासाठी आवश्यक असणारे साहित्य ,पुरवता येईल. व हा उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवता येईल.
या वेळी माणदेशी फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या या वर्षाचा दुष्काळ 1972च्या दुष्काळा पेक्षा भयानक आहे. माण तालुक्याला दुष्काळ हा एक शाप लागलेला आहे.यंदाच्या दुष्काळाने शेतकर्याचे कबंरडं मोडले असताना त्यांचे हाल पहावत नव्हते.त्यात हा या तालुक्यात शेतकरी शेती हा शेतीवर अवलंबून असतो.शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात गाई व म्हैशींचे पालन करून दुग्धाच्या व्यवसायातून मुलांचे शिक्षण व संसाराचे रहाटगाडगे गाडगे चालवत असतो.दुष्काळाशी त्यांचा सुरू असलेला लढा पहावत नव्हता म्हणून 1जानेवारी ला राज्यात पहिली चारा छावणी सुरू केली. तीन महिण्याची हमी मिळाली होती.छावणीत चार्याची कमतरता नव्हती परंतु पाणी कुठून आणायचे सर्व नाटकं करता येतील परंतु पाण्याचे नाटक करता येत नाही. उरमोडीचे पाणी माणगंगानदीत सोडण्यासाठी पाठपुरावा केला. पाण्या अभावी छावणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान छावणीत खडकी यथील एक शेतकरी महिला भेटली व म्हणाली भाभी एक ग्राम सोन्याचा दर किती?3200रूपयेआहे.तर कडब्याचा दर 4200रूपये आहे. मी सोनं मोडून सोन्याच्या दरापेक्षा महाग असलेली वैरण विकत घेऊन जनावरांना चारत आहोत.एक एक गाय 60ते80रूपये किमतीची आहे. या जनावरांच्या दुधावर आमच्या मुलांचे शिक्षण अवलंबून आहे. त्यांचे शिक्षण बंद होईल व ते आम्हाला परवडणारे नाही. हे ऐकून मी भावनांविवश झाले.चार महिन्यात पाण्याचा समस्येबरोबर जनावरांना लाळीचा रोग आला.माण तालुका हा खिलारी जनावरांसाठी प्रसिध्द आहे. ही खिलार जनावरं इतिहास जमा होणार नाहीत.या साठी राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शब्दांवर चारा छावणी सुरू ठेवली त्यांनी आत्मविश्वास दिला माझ्या 30वर्षाच्या सार्वजनिक जिवनात चंद्रकांतदादा सारखा शेतकर्याच्या बद्दल हृदयात तळमळ असलेला नेता पाहिला नाही. आज त्याच्या सारखं नेतृत्व मंत्रालयात आहे.म्हणून उरमोडीचे पाणी माण मध्ये येते ही म्हणून ज्यांच्या हृदयात माण व माणचा शेतकरी आहे.
यावेळी ओला फौंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या 150 शालेय विद्यर्थिनींना ना.चंद्रकांतदादा यांचे हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास शेतकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा कुलकर्णी यांनी तर उलस्थितांचे आभार सुषमा शेडगे यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular