कराड : गायत्री नियमित पठठण केल्यास मेंदूतील अतिंद्रिय शक्ती विकसित होते. तसेच बुध्दीची व स्मरणशक्तीची क्षमता वाढते. उपनयन संस्कार, संध्या, गायत्री मंत्र यंाचे आपल्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण असुन विद्यार्थ्यांनी नियमित गायत्री मंत्राचे पठठ करणे गरजेचे असुन देशस्थ ॠग्वेदी ब्राह्यण संघाने आयोजित केलेला सामुदायिक उपनयन सोहळा हा सामाजिक कार्याचा आदर्श वस्तुपाठ आहे. असे गौरदगार पं. हरीकृष्ण घळसासी यांनी काढले.
देशस्थ ॠग्वेदी ब्राह्यण संघ कराड व ब्राह्यण वधुवर सुचक मंडळ यंाचे संयुक्त विद्यमाने आयोजित सामुदायिक उपनयन सोहळयात ते बोलत होते. यावेळी, रामभाऊ आफळे दिलीप रामदासी, नितीन शाळीग्राम, कर्नल, एम.डी. कुलकर्णी, प्रमोद सप्रे. दत्तात्रय पानसरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णाबाईमंगल कार्यालयात संपन्न झालेल्या या सोहळयात आठ बटुंच्या सामुदायिक मुंजी करण्यात आल्या: उपनयन संस्काराचे धार्मिक कार्य शैलेश कुलकर्णी गुरूजी व त्यांचे सहकारी मल्हारी उमराणी व ॠषिकेष जोशी यांनी पार पाडले. कृष्णामाई उत्सव कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव पालकर यांनी यावेळी बटुंना शुभाशीर्वाद दिले. प्रास्ताविकात दत्तात्रय पानसरे यांनी आयोजना मागची भुमिका विषद करून सांगितली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, सौ. वैशाली आगरकर व पी.डी. कुलकर्णी यंानी केले.ेआभार प्रदर्शन प्रमोद सप्रे यंानी केले.
यावेळी बटुंचे नातेवाईक, मित्रमंडळी सोहळयाला अगत्यपुर्वक उपस्थित होते. सर्वांनी भोजनाचा लाभ घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी एन.डी. कुलकर्णी, सुनीपोतनीस, सचिन गरूड, भाऊ भिंगारे, वनमाला, जोशी व त्यांच्या सर्व सहकार्यंानी परिश्रम घेतले.
गायत्री मंत्राचे नियमित पठण करावे: घळसासे
RELATED ARTICLES