कराड: सध्या आंब्यांचा हंगाम चालु आहे मात्र गतवर्षीच्या तुलनेत बाजारातील आंब्याचे दर तेजीत आहेत. कलींगडांचा हंगाम संपत आल्याने बाजारातील उपलब्ध कलींगडे महाग आहेत. तसेच उन्हाळी भुईमुगाचे दर ही तेजीत आहेत. पंढरपूर, म्हसवड, माण भागात दुष्काळाने डाळिंबाच्या बागा करपल्या असल्याने बाजारात डांळीबाची आवक नाही मात्र पाटण तालुक्यातील काकडीचे दर वधारले आहेत.
कोकण पटयातील हुकमीफळ फणस अजुनही बाजारात दिसत नाही.तसेच राणा वनातील रानमेवा करवंद, जांभळे दुर्मिळ झाली आहेत. उपलब्ध करवंदे, जांभळे यांचे दर तेजीत आहेत. त्यामुळे उन्हाळयातील फळफळावळ खाणे म्हणजे नागरीकांच्या बजेटला परवडणे कठीण झाले आहे.
गतवर्षी पाऊसमान बर्यापैकी झाला. त्यामुळे यावर्षी उन्हाळी फळांची पीके चांगल्या प्रमाणात बहरतील असे वाटत असतानाच यावर्षी वातावरण मोठया प्रमाणात तापले आहे. त्यामुळे फळांच्या पीकावर तसेच बागावर त्याचा परिणाम झाला आहे पंढरपुर म्हसवड माण, खटाव या भागात डाळींबाचे उत्पादन घेतले जाते.
मात्र यावर्षी या भागात मोठा दुष्काळ पडला आहे. पिण्याचा पाण्याबरोबरच शेतीलाही पाणी नाही त्यामुळे डाळींबाच्या बागा जाग्यावरच करपुन गेल्या आहेत. त्यामुळे या भागातील शेतकर्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कोकणाचा राजा म्हणुन हापुस पायरी आंब्याच्या उत्पादनाकडे पाहिले जात मात्र या वेळी कोकण परिसरातही हवामान बदलामुळे आंब्यांचे पिक घटले आहे- त्यामुळे बाजारात उत्पादीत मालाची आवक घटली असल्याने आंब्याचे दरही जवळपास दोन डझन आंब्याच्या पेटीला 400 रूपया पासुन 700 रूपया पर्यंत दर वाढला आहे.
सांगली, तासगाव,पलुस, कराड, माण तालुका येथील शेतकरी कलींगडाची लागण करतात परंतु यावर्षी या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बाजारातील कलींगडे महाग आहेत. 30 रूपया पासुन 150 ते 200 रूपयांना नगाने विकली जात आहेत.
पाटण, तालुक्यातील काही शेतकर्यांनी उन्हाळी काकडी व भुईंमुगाच्या पिकांची लागवड केली आहे. मात्र त्याचेही प्रमाण कमी आहे आज कराडच्या बाजारात काकडीचा दर 80 ते 100 रूपये किलो आहे. तर आलेल्या भुईमुगाच्या शेंगा 80 मे 100 रूपये किलोने विकल्या जात आहेत. करवंद व जांभळेही म्हणावी तशी उपलब्ध नाहीत, करवंद व जांभळे कोळव्याच्या मापाने विकली जात आहेत. एका कोळव्या दर 20 रूपये आहे.
बाजारात आंबा, कलिंगड, करवंद, जांभळाचे दर तेजीत
RELATED ARTICLES