Wednesday, February 25, 2026
Homeठळक घडामोडीवाईतील अनेक गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर

वाईतील अनेक गावे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर

वाई : वाई तालुक्यात पाण्याचा स्त्रोत आटल्याने अनेक गावे पाणी टंचाईच्या विळख्यात अडकली आहेत. वाईच्या प्रांत कार्यालयाकडून काही गावेच पाणी टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. वाई तालुका अतिवृष्ठीचा तालुका म्हणून जरी प्रसिध्द असला तरीही गेल्या काही वर्षात सरासरीच्या मानाने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. तरी सुध्दा पाणी अडवा-पाणी जिरवा या योजनेवर प्रशासनाकडून कोणतेही भरीव काम न झाल्याने तालुक्यातील सात पैकी एकाही पाझर तलावात चिमणीलाही पिण्या इतके पाणी शिल्लक नाही, दर वर्षी प्रत्येक पाझर तलावात थातूर-मातुर करून गळती काढल्याचे नाटक करून बिले मात्र प्रामाणिक पणे काढली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर होताना दिसतो. संपूर्ण तालुक्यात कुठेही भरीव जलसंधारणाचे काम न झाल्याने प्रांत कार्यालयात कागदोपत्री नोंद नसलेली गावे पाणीटंचाई ग्रस्त गांवे म्हणून समोर येताना दिसत आहेत. वाईच्या पश्चिम भागात पावसाळ्यात प्रचंड पाऊस, परंतु पाणी अडविण्यासाठी कोणतीही उपाय योजना न केल्याने लाखो लिटर पाणी दररोज वाहून जाते. याच भागात उन्हाळ्यात धरण उशाशी असताना कोरड मात्र घशाला पडलेली असते. कित्येक किलोमीटर पाणी पिण्यासाठी डोक्यावरून वाहून न्यावे लागते. दरवर्षी पश्चिम भागात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. याला प्रशासनाचा ढम कारभार जबाबदार आहे. वाईच्या पूर्व भागात पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने धोम धरण या बलकवडी धरणाच्या पाण्यावर या ठिकाणची शेती अवलंबून आहे. या दोन्ही भागात जलसंधारणाच्या कामाविषयी प्रचंड उदासीनता पाहायला मिळते. प्रशासनाकडून कसल्याही पद्धतीचे प्रबोधन या भागात करण्यात येत नाही. वाई तालुक्यातील ठराविक गावांमध्ये सीसीटी बंधार्याची कामे काही सामाजिक संस्थाकडून करण्यात येतात परंतु प्रशासन मात्र त्याची साधी दखल सुध्दा घेताना दिसत नाही, जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत वाई तालुका जलसंधारणाच्या कामात प्रचंड पाठीमागे आहे, लोकांचा सहभाग तर अजिबात नाही, ज्या धरणांच्या जीवावर वाई तालुका निवांत राहत आहे. त्या धरणाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे, धरणात पाण्याच्या चाळीस टक्के गाळ साठलेला आहे. याचे कसलेली सोयर -सुतक पाटबंधारे खात्याला नाही. काही वेळा कालव्याला भगदाड पडल्यास ते बुजविण्याचे काम सुद्धा वेळेत केले जात नाही, लाखो लिटर पाणी वाया जाते, या एकाद्या शेतकर्याचे शेतात पाणी घुसल्याने नुकसान होते. पंचायत समितीचा पाणी पुरवठा हा तालुक्यातील पाझर तलावांची दुरुस्तीची जबाबदारी आमची नाही असे जाहीर म्हणून जलसंधारणा विषयी उदासीनता असल्याचे दाखवून देतो. तालुक्याच्या दक्षिणेला नागेवाडी धरण आहे. त्याची कर्म कहाणी विचित्र आहे, नागेवाडी धरण जेमतेम पाऊण टीएमसी आहे, धरणाच्या उभारणीपासून वीस वर्षे धरणाला कालवेच काढलेले नव्हते. पाण्याला उपसा नसल्याने ते पाणी ना पिण्या योग्य आहे, ना शेतीला देण्या योग्य आहे. त्यातच या भागात पावसाचे प्रमाण त्या मानाने कमीच आहे, पाचगणी परिसरात पडणार्‍या पावसावर या धरणातील पाण्याची पातळी अवलंबून असते. याही परिसरात कसल्याही प्रकारचे जलसंधारणाची कामे झालेली नाहीत. उत्तरेला मांढरदेव भागात सुध्दा हीच परिस्थिती आहे. पावसाळ्यात सुकाळ मात्र उन्हाळ्यात टँकर शिवाय पर्याय नाही, ग्रामीण भागातील ग्रामस्थ पाणी टंचाईच्या झाळ सहन करीत आहेत, पण पाणी अडवा पाणी जिरवा या बाबत कसलेही काम करताना दिसत नाहीत. या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. तरीही पडणारे पावसाचे पाणी अडविताना कोणीही दिसत नाही. दररोज चावडीवर बसून राजकारणाच्या देश पातळीवरील गप्पांचा फड रंगतो पण पाण्याच्या नियोजनाविषयी कसलीही चर्चा होत नाही, वाई तालुका सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु सध्याच्या ज्वलंत असणार्‍या पाण्याच्या नियोजनाविषयी सर्वात मागासलेला तालुका आहे. जलसंधारणाविषयी कोणतेही भरीव काम नाही, या तालुक्यातील प्रशासन ढम्म तर आहेच परंतु नागरिकांमधून कोणताही उठाव झालेला सुध्दा दिसत नाही, हे दुर्दैव म्हणावे लागेल. संपूर्ण तालुक्याला चारही बाजूनी सह्याद्रीच्या रांगा, निसर्गरम्य परिसर, पावसाचे प्रमाण त्या मानाने योग्य तरीही आज मितीला पाण्यासाठी टंचाई ग्रस्त तालुका नवीन ओळख निर्माण करताना दिसत आहे, तरी प्रशासनाने जलसंधारणाची कामे पावसाळ्या पूर्वी करण्याचा प्रयत्न करीत, तसेच योग्य प्रबोधन केल्यास पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना कार्यान्वित होवून पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागण्यास निश्चित मदत मिळेल यात शंकाच नाही. व पुढील वर्षी तालुक्याला टँकरची गरज भासणार नाही.तरी चालू असणार्‍या उन्हाळ्याच्या सुट्टीत नागरिकांनी सुध्दा पुढाकार घेवून पाणी अडविण्यासाठी सीसीटी बंधारे बांधल्यास, या काम करणार्‍या सामाजिक संस्थांना सहकार्य केल्यास चांगल्या प्रकारचे पाणी अडविले जावून उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular