Wednesday, February 25, 2026
Homeठळक घडामोडीनागेवाडी धरणातून पाणी सोडण्याची बावधनसह बारा वाड्यातील शेतकर्‍यांची मागणी

नागेवाडी धरणातून पाणी सोडण्याची बावधनसह बारा वाड्यातील शेतकर्‍यांची मागणी

शेवटचे आवर्तन न सोडल्यास पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न होणार गंभीर
वाई : वाई तालुक्यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे धरण आहे. या धरणात पाव टीएमसी पाणी साठवले जाते. नागेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर धरणातून पाणी पुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे, नागेवाडीच्या धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास उन्हाळ्यातील पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे हमकास उत्पन्न देणारे पिक वाया गेल्याने आर्थिक नियोजन वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बावधनसह बारा वाड्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यातच नागेवाडी धरणाला तीन ते चार ठिकाणी गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे, तरीही नागेवाडी पाटबंधारे खाते गांधारीच्या भूमिकेत आहे. ही अतिशय खेदाची बाब असून पाटबंधारे खात्याने त्वरित लक्ष घालून होणारे लिकेज काढावे व होणारा पाण्याचा अपव्यय थांबवावा, नागेवाडी पाटबंधारे खात्याच्या कामकाजाविषयी शेतकर्‍यांमध्ये प्रचंड चीड आहे. लिकेजमुळे धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. पाटबंधारे खात्याने योग्य नियोजन न केल्याने पाण्यात जे मत्स पालन केले जाते. ते योग्य पद्धतीने न केल्याने व पाणी वाहते नसल्याने पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत आहे. आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून बावधनसह बारा वाड्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरीही पोट पाटाची कामे आजमितीला अपूर्णच आहेत. पोट पाटाची कामे पूर्ण झाल्यास संपूर्ण शेती ओलीता खाली येवू शकते. पाच हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येवू शकते. तरीही धरणातील पाणी बारमाही शेतीला पुरेल याची खात्री देता येत नाही. नागेवाडी धरणात होणारे मत्स्य पालन बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. धरणाची पाणी संकलन करण्याची क्षमता कमी असल्याने ना शेतीला पाणी ना देवू शकत या बारमाही वाहते ठेवू शकत अशी काहीशी अडचण नागेवाडी धरणाबाबत आहे. धरणाची उंची वाढवून धरण क्षेत्र वाढविण्यासाठी पाटबंधारे खात्याने प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरत आहे.
बावधनसह बारा वाड्यातून हळद, उसाच्या पिकांबरोबर बागायती क्षेत्र बर्‍यापैकी असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. पाटबंधारे खात्याने पाण्याची योग्य काळजी न घेतल्याने पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात झाल्याने नागेवाडी धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. लिकेज होणार्‍या पाण्यावर नागरिकांनी पाईप लावून वाया जाणारे पाणी शेतीकडे वळविले आहे. म्हणून मुख्य लीकेजच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लिकेजमुळे शेवटचे आवर्तन न सोडल्यास गहू, उन्हाळ्यात घेण्यात येणारी भुईमुग, घास, व इतर बागायती पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बारा वाड्यांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. पाण्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याने पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे. दुर्गंधयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सध्या या परिसरात चालू आहे. धरणातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने बारा वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतिशय गंभीर बनला आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्या बिकट बनला असूनउन्हाळ्यात शेतीसह जनावरांचेपाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत जनावरांचा सांभाळ करताना शेतकर्‍यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. असे विदारक चित्र सध्या धरणावर दुर्दैवाने दिसत आहे. नियोजन करून संपूर्ण गळती काढून पुढील हंगामात धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होवो व कालव्यात पाणी सुरळीत चालू राहो एवढीच अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular