म्हसवडः माण तालुका दुष्काळग्रस्त असा ठसा उमटलेला तालुका या तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी पाणी फाउंडेशन च्या मदतीने दोरगेवाडीने कंबर कसली असून त्यांच्या मदतीला आलेली अहिंसा पतसंस्था व त्यांचा संपूर्ण परिवार पाहून आ. जयकुमार गोरे म्हणाले की अहिंसा पतसंस्था ही बँकेबरोबरच सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर आहे. त्यांनी पाणी फाउंडेशन च्या कामासाठी शारीरिक कष्ट करून आर्थिक मदत ही अनेक ठिकाणी केली आहे असे विधान दोरगेवाडी येथे अहिंसा पतसंस्थेच्या वतीने धनादेश दोरगेवाडी पाणी फाउंडेशन साठी देताना विधान केले व पुढे ते म्हणाले की,अहिंसा पतसंस्थेचे खर्या अर्थाने माण च्या मातीशी नाते जपले असून माण च्या मातीसाठी त्यांचे योगदान बहुमोल आहे असे ते म्हणाले.
या प्रसंगी अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवड नगरीचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी, संचालक अनिल देशमाने पतसंस्थेचे व्यवस्थापक महेश पतंगे,उपव्यस्थापक प्रशांत आहेरकर,दीपक मासाळ,अमजद मुजावर, अक्षय धट,मनोज शिंदे,गावातील आबालवृद्ध उपस्थित होते
अहिंसा पतसंस्थेने माण च्या मातीशी नाते जपले ः आ.जयकुमार गोरे
RELATED ARTICLES