साताराः आजच्या धकधकीच्या युगात स्त्रियांनी सक्षण होणे गरजेचे आहे. सावीत्रीबाई फुले यांच्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळापर्यतत पोहचली असे उदगार प्रा.स्नेहल राजहंस यांनी काढले. त्या दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसा.लि. तळमावले च्या विद्यानगर शाखेच्या व्दितीय वर्धापनदिनी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ.कोमल कुंदप, मधु नेने, सौ.अनिता जाधव, सिस्टर व्हे रेडिएना, अॅड चव्हाण, अॅड जनार्दन बोत्रे, हेमंत तुपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्राचीन काळामध्ये अनेक जाचक रूढी,परंपरा मोडीत काढण्याचे काम थोर समाजसुधारकांनी केले आहे त्यामुळे स्त्रियांना आज समाजामध्ये मानसन्मान आणि प्रतिश्ठा मिळत आहे. इतिहासामध्येे अनेक संस्कारक्षम घडून गेली आहेत.
सौ.अनिता जाधव म्हणाल्या स्त्रियांनी सध्याच्या काळात बचत करणे महत्त्वाचे आहे बचत ही म्हातारपणाची काठी आहे.शिवसमर्थच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेवून आपण आपले उज्वल भविश्य उज्ज्वल करा.
मधु नेने म्हणाले,छ.शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याचा आजच्याही जीवनात उपयोग होवू शकतो यासाठी समर्थ रामदास यांच्या ग्रंथाचा, ओव्यांचा अभ्यास करावा. समर्थानी त्यांच्या ओव्यामधून बचतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कोमल कुंदप यांनी तर आभार प्रदर्शन अंजली पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापुजन, दीपप्रज्वलनाने झाली. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदीप डाकवे (पत्रकार उपसंपादक-साप्ताहिक शिवसमर्थ) यांनी केले.
महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ, महिलांच्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांना वाणवाटप करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी,अधिकारी, सल्लागार, यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमास सभासद, ठेवीदार महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे, उपमहाव्यवस्थापक हेमंत तुपे, सिस्टर व्हेरेडिएना यांनी मार्गदर्शन केले.
स्त्रियांनी सक्षम हेाणे गरजेचेः प्रा.स्नेहल राजहंस
RELATED ARTICLES