वडूज: खटाव तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने तडवळे (ता. खटाव) येथे जनावरांच्या चार्याचा प्रश्न अतिशय बिकट बनला आहे. कुणी छावणी देता का हो अशी म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. नेते मात्र छावणीच्या विषय काढला की पाठ फिरवतात कारण शासनाच्या असणार्या जाचक अटीमुळे छावणी घेण्यासाठी कोणीही तयार होत नाहीत.
तसेच विकास सेवा सोसायटी छावणी घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने शेतकरी राजा अडचणीत आला आहे. तडवळे गावामध्ये पशुधन हा व्यवसाय असून लहान-मोठी असे सर्वसाधारणपणे एक हजार जनावरे गावांमध्ये आहेत त्याचप्रमाणे शेळ्यामेंढ्या यांचाही चार्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांना छावणी सुरू न झाल्यास आपली जनावरे आणि शेळ्या-मेंढ्या विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही तरी प्रशासनाने या गावांमध्ये छावणी सुरू करून शेतकर्यांना दिलासा द्यावा हीच ग्रामस्थांच्यावतीने एकमुखी मागणी करण्यात आली आहे
तडवळे ग्रामस्थांचा छावणीसाठी आक्रोश
RELATED ARTICLES

