साताराः जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झालेला कास परिसर पर्यटकाना आकर्षित करीत आहे. सुट्टीच्या काळात जिल्हयाबरोबर राज्यातील ही अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. विशेषतः कास तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या परिसराला जागजिक दर्जा प्राप्त होत आहे. येथे देशी विदेशी पर्यटकाबरोबरच तरुणाईची या ठिकाणी अधिक पसंती लाभत आहे. बर्याचदा उत्साहाच्या भरात तरुणाईकडून या ठिकाणच्या परिसराला गालबोट लागत आहे. अनेकजन जलविहारचा आनंद लुटताना कास तलावातील पिण्याचे पाणी दुषित ही करत आहेत. याचे भान ही त्याना उरत नाही.
संपुर्ण सातारा नगरीला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा कास तलाव शहरातील नागरिकांची ऐन उन्हाळयात ही तहान भागवत असताना अनेक हौशी पर्यटकाकडून गालबोट लागत असल्याच्या घटना घडत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात असलेला कास तलाव पाहाण्यासाठी अनेक पर्यटक या स्थळास भेटी देत असतात. दरवर्षी या ठिकाणी भेटी देणार्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. शांत रमणीय व निसर्गाच्या सानिध्यात असणारा हा परिसरात पर्यटकाना मौजमजा लुटण्याचा एक वेगळाच आनंद या ठिकाणी मिळतो. राज्याबरोबर देशातले व विदेशातील पर्यटक या ठिकाणी मोठया प्रमाणात येतात. कास तलावाचा विस्तीर्ण परिसर मोठा विलोभनीय वाटत असल्याने असंख्य पर्यटक आपल्या कॅमेर्यात व मोबाईलमध्ये निसर्गातील वास्तव चित्र साठवून ठेवत आहेत. येथील थंड हवा मनाला अल्हादायक वाटत असल्यामुळे ऐन उन्हाळयात पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो. निसर्गातील पर्यटनाचा आनंद लुटण्याबरोबर काही हौशी व अति उत्साही पर्यटकाचा येथे अतिरेक होत असल्याने येथील परिसरास अनेकदा गालबोट लागले आहे. अनेकदा या ठिकाणी तरुणाई मौजमज्या करताना मद्यपीचा होत असणारे सेवन वादविवादाला कारणीभुत ठरते तर काही अति उत्साही पर्यटक नशेमध्येच कास तलावाचा वापर जलतरणाचा आनंद उपभोगण्यासाठी करताना दिसून येतात. ही दुदैवी बाब आहे.वास्तविक सातारा नगरीला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा कास तलावाच्या सुरक्षितेची यंत्रणा आता उभी करणे गरजेची भासू लागली आहे. पर्यटकाची वाढती संख्या व कास तलावात जलतरणाची वाढलेली क्रेझ पाहाता येथील पाण्याचे होणारे दिुषतीकरण रोखणे गरजेचे बनलेले आहे. त्याचप्रमाणे येथे येणार्या पर्यटकावरही अंकुश ठेवणारी यंत्रणा उभी राहणे आवश्यक असलेचे मत अनेक निसर्गप्रेमीकडून व्यक्त होत आहे.
संपुर्ण राज्यात पाण्याची त्रीव टंचाई आहे. अशा वेळी जलसाठयांची जपणूक करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विशेषता पिण्याचे पाणी पुरवठा करणारे तलाव हे दूषित न होता ते सुरक्षित राहीले पाहीजे याची दक्षता या पुढील काळात घेणे गरजेचे आहे. बर्याचदा पर जिल्हयातून येणारे पर्यटक आपली वाहने तलावाच्या पात्रात उभी करुन वाहने स्वच्छ करतात. यावेळी वाहनामधील कचराबरोबरच आईल पेट्रोल पाण्यामध्ये मिसळत आहे. याची आता गाभिर्याने दखल संबंधीत यंत्रणेने घेणे आवश्यक असल्याचे मत निसर्गप्रेमीकडून व्यक्त होत आहे. दुषितीकरण करणार्या पर्यटकावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारायास हवा.
कास तलाव सातारकरासाठी खर्या अर्थाने जीवनदायी आहे या ठिकाणी हौशी पर्यटकाकडून तलावाचा जलतरणासाठी होत असलेला वापर निंदणीय आहे. जल है …. तो कल है असा नारा व संदेश देणारे शासन व सामाजिक संस्था अहोरात्र झटत असताना पर्यटन स्थळी पाण्याचे दुषितीकरण करणार्यांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. कास तलावाची जपणूक ही सर्वांची आहे याचे ही भान प्रत्येक नागरिकांनी ठेवले पाहीजे.
उत्साही पर्यटकांचा कास तलावात जलविहार
RELATED ARTICLES