Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपंढरपुरमधील पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात

पंढरपुरमधील पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा उत्साहात

फलटण: सातारा जिल्ह्यातील आसु ता.फलटण येथील राजेंद्र फुले यांची कन्या झेप फाउंडेशनच्या अध्यक्षा कवयित्री लेखिका निशा फुले यांचा विवाह पंढरपुर मधील उद्योजक अजिंक्य अशोक देवमारे यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला. यावेळी हुंडा,मुहूर्त,अंधश्रद्धा यांसारख्या कालबाह्य प्रथांना नाकारुण उभयतांनी वैवाहिक जीवनाची सुरुवात केली.
पंढरपुरमधील हा पहिलाच सत्यशोधक विवाह सोहळा ठरला. निशा फुले या महात्मा ज्योतीराव फुले आणि सवित्रीमाई फुले यांच्या कार्याने प्रेरीत झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातुन व्याख्यान् देणार्‍या उत्तम व्याख्याती बनलेल्या आहेत.खुप वर्षांपूर्वीपासूनच आपला विवाह हा सत्यशोधक पद्धतीने व्हावा हा निश्चय मनाशी बाळगला होता.त्यानुसार त्यांनी पंढरपुर येथे सत्यशोधक पद्धतीने विवाह केला.
यावेळी हिंदु धर्मातील लग्न सोहळ्यातील इतर धार्मिक विधीला नाकारत जो विवाह बाबतचा विचार महात्मा फुले यांचा होता त्याच सत्यशोधक विवाह सोहळ्याचा स्वीकार करण्यात आला.महात्मा फुले लिखित सत्य शोधक मंगल अष्टका रघुनाथ ढोक यांनी संगीत सुरात म्हटले. तसेच नववधु वर यांना एकमेकांप्रति जबाबदारी स्विकारण्याच्या शपथा प्रतिज्ञा दिल्या गेल्या. फ्लेक्स वरती सर्व महामानवाच्या प्रतिमा दिसत होत्या.वधुवरांच्या डोक्यावर तांदळाच्या अक्षदा टाकण्याऐवजी गुलाब व झेंडू फूलांचा वापर केला.
तांदूळ हा पदार्थ अन्न म्हणुन उपयोगात गेला पाहिजे.ते तांदूळ गरजवंतांच्या पोटात जावेत म्हणुन लग्नाच्या पुर्वी निशा फुले आणि त्यांच्या सह परिवार यांनी टेंभुर्णि येथील गोकुळ वृद्ध आश्रमात तांदूळ भेट दिले. चि.सौ.का च्या ऐवजी मुलाला सत्यशोधक आणि मुलीला सत्यशोधिका हा शब्द प्रयोग हा नावाच्या अगोदर संबोधलेला पाहायला मिळाला. इतर लग्नातून लग्नादिवशी आपल्याला डीजेच्या आवाजाच्या तालावर नाचणारे डान्सर पाहायला मिळत असतात.परंतु अशा प्रकारे कोणतेही वाद्य नाचगाण्यासाठी या लग्न सोहळ्यात नव्हते.बँड वाद्य,मिरवणूक, वरदवा, फटाकडे वाजविणे,
अक्षदा टाकणे आदि जुन्या प्रथा यांना तिलांजली देत हा विवाह सत्यशोधक पद्धतीने पार पडला.एक आदर्शवादी सोहळा संपन्न पार पडत असताना. यावेळी पुस्तक भेटीचा ही एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मान्यवर यांना हार तुरे देण्याऐवजी निशा फूले लिखित माझी झेप आकाशी हे पुस्तक आणि झाडाची रोपटे भेट देण्यात आली.लोकांमध्ये वाचन संस्कृतीला गती मिळावी तसेच झाडे लावा झाडे जगवा चा संदेश पोहचायला हवा म्हणुन हा एक प्रयत्न लग्न सोहळ्यात प्रेरक असा ठरला.
फुले शाहू आंबेडकर यांचे विचार सांगणारे अनेक जण आपल्या अवती भवती दिसत असतात.
परंतु त्यांच्या विचारांप्रती किती जण कृतिशील कार्यक्रमाची आखणी करतात.हल्ली विचार हे सोईनुसार आचरणात आणले जात असतात.त्यामुळे हा चिंतनाचा विषय बनला आहे.परंतु आज या विवाह सोहळ्याच्या माध्यमांतून फुले यांच्या कार्याला जपले जात असल्याचे चित्र दिसून आले.
24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केल्यानंतर महात्मा फुले यांनी पुरोहिताशिवाय लग्न लावण्याची पद्धत सत्यशोधक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून पुढे आणली.काही वर्षांपूर्वी मांडला गेलेला विचार आज ही तोच कित्ता गिरविण्याचे कार्य फुले विचार जपणार्‍या निशा फुले यांच्या लग्न सोहळ्यात पाहायला मिळाला.
या विवाह सोहळ्यास संत सावता माळी महाराज यांचे वंशज श्री ह.भ.प वसेकर महाराज यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.या उपक्रमामुळे दोन्हीकडील परिवाराचे विशेष कौतुक केले जाते आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular