कराड: धावरवाडी (ता.कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याने सन 2018-2019 या हंगाम काळात गळीतास आलेल्या ऊसासाठी 256 रूपयांचा तिसरा हप्ता शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग केला आहे, अशी माहिती जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जयवंत शुगर्स हा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी देणारा कारखाना ठरला असून, कारखान्याने आत्तापर्यंतची एकूण एफआरपी 2956 रूपये शेतकरी सभासदांना अदा केली आहे. तसेच कारखान्याचा गेल्या हंगामातील सरासरी साखर उतारा 13.02 टक्के राहिला असून, तोही जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा ठरला आहे.
याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की जयवंत शुगर्सने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य देत ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. जयवंत शुगर्सने यापूर्वी एफआरपीच्या एकूण रक्कमेपैकी 2400 रूपयांची पहिली; तर 300 रूपयांची दुसरी उचल शेतकरी सभासदांना अदा केली होती. त्यानंतरचा 256 रूपयांचा हा तिसरा हप्ता देण्यात आला आहे. सन 2018-2019 च्या गळीत हंगामात कारखान्याने एकूण 6 लाख 41 हजार 979 मेट्रीक टन ऊसगाळप केले आहे. सातारा जिल्ह्यात साखर उत्पादन, गाळप, उतारा आणि दरामध्ये मजयवंत शुगर्सफने नेहमीच आघाडी घेतली असून, या सर्व यशामागे कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचार्यांचे श्रेय आहे. येत्या हंगामातही सर्वांनी अधिक चांगले सहकार्य करून कारखान्याला प्रगतीपथावर न्यावे, असे आवाहन संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केले आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक एफआरपी आणि सरासरी गाळप उतार्यात जयवंत शुगर्स ठरला नंबर वन!
RELATED ARTICLES