म्हसवड : दोन वर्षांपासून उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास होत असून सातारा पंढरपूर महामार्गाच्या आडमुठ ठेकेदाराच्या धोरणामुळे शिंदेवाडी, पिंगळी, गोंदवले, सत्रेवाडी, महिमानगड या ठिकाणी रस्त्याची उंची वाढवून त्या बाजूच्या साईड पट्ट्या व नाले न केल्याने अनेक घरात पाणी जात आहे. मात्र याकडे कोणी लक्ष देत नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र स्थानिक प्रशासन याला पाठीशी घालत असल्याने संबंधित ठेकेदाराची मुजोरी वाढत चालल्याचे दिसत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
काल रात्री पाऊस झाल्या नंतर पिंगळी नाजिक सत्रे वस्ती वरती एक लहान मुलगा पाण्यात बुडत असताना शेजारील नागरिकांनी धावत जाऊन त्याला वाचवले त्यामुळे याठिकाणी मोठी घटना टळली आहे. अन्यथा लहान मुलांचा या ठिकाणी नाहक जीव गमवावा लागला असता. ही घटना घडताच येथील नागरिकांनी रस्त्यावरती उतरत हायवे प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन चालू केले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील, मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अतुल पवार, मानव अधिकार संघटना जिल्हाध्यक्ष विजय जगदाळे, तसेच पिंगळी मधील ग्रामस्थ यांनी दोन तास रस्त्यावरती ठिय्या मांडला होता.
अनेक वेळा महामार्ग प्रशासन व महसूल विभाग, पोलिस प्रशासनाकडे तक्रारी देऊन देखील या ठिकाणी हायवे लगत असणार्या घरात पाणी शिरत असल्याने या नागरिकांचा रोष वाढला होता. त्यांनी रस्त्यावरती ठिय्या आंदोलन केल्या नंतर महसूल प्रशासन एका तासात दाखल झाले होते. मात्र यावरती कोणतीही कार्यवाही रात्री करण्यात आली नाही. संबंधित ठेकेदाराला तहसीलदार यांनी फोन करून तत्काळ कारवाई करून पाणी बाजूने काढून देण्यास सांगितले. व काही वेळाने पोलिस व महसूल विभागाच्या मध्यस्थी नंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
धैर्यशील पाटील जिल्हा अध्यक्ष मनसे
हायवे मुजोर प्रशासनाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाने करू नये, 57 नागरिकांचा मृत्यू या मुजोर ठेकेदारांमुळे झाला आहे. काही दिवसातच संपूर्ण जिल्ह्यात याचे पडसाद उमटणार आहेत. या ठिकाणी जर पाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप टाकल्या नाहीत तर, संपूर्ण हायवे चक्का जम तर करणार आहोतच. पण संबंधित ठेकेदाराला सुद्धा मनसे स्टाईलचा दणका देणार आहोत..
विजय जगदाळे
अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच, एवढ्या दिवस धुळीचे साम्राज्य तर आज पाणी आणि चिखलाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकारी यांनी यावरती कारवाई करून ठेकेदारावरती गुन्हे दाखल करावेत.
सातारा- पंढरपूर महामार्गाच्या साईड पट्ट्या व नाले न केल्याने घरात पाणी
RELATED ARTICLES