वाई : 2 जुलै पासून धोम धरणाच्या पाण्यात बेमुदत आंदोलनकरण्याचा निर्धार धोम, कणेर धरणग्रस्त संयुक्तरीत्याकरण्यात आला होता त्या साखळी आंदोलला सकाळी आकरा वाजता धोम धरणावरून पांडुरंगाची पालखी वाजत-गाजत काढण्यात येवून बोरीव येथे धरण क्षेत्रात येवून पाण्यात उभे राहून जनांदोलनाला सुरुवात करण्यात आली. शासन जोपर्यंत धोम व कणेर धरणात जमिनी गेलेल्या लाभार्थींचे योग्य रित्या पुनर्वसन करण्याचा पुनर्वसन खात्याला आदेश देत नाही तोपर्यंत पाण्यातून बाहेर न येण्याचा निर्धार जनजागरण प्रतिष्ठानने एक मुखी निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हाधिकार्यांनादोन जुलै पासून धोम धरणामध्ये पाण्यात दिवस रात्र बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आलाहोता.धोम-कणेर् लाभक्षेत्रातील धरणग्रस्तांनी आपापल्या गावांमध्ये बैठकीत घेवून आंदोलनाला स्वरूप देण्यात आले.तसेच आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करून साखळी आंदोलन यशस्वी होण्यासाठी धोम धरणातील एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी ्अखेरची आरपारची लढाई लढण्यासाठी सर्व गावचे सरपंच, सामाजिक गणेशोत्सव मंडळे,गावागावांमधे असणारी सामाजिक काम करणारी मंडळे,तरूण मंडळी,महीलावर्गयांनीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. साखळी आंदोलन राजकारण विरहीत असून सर्वच अन्याय झालेले सर्व लाभधारक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पाण्यातील साखळी आंदोलन यशस्वी कण्याची खुणगाठ बांधून मशाली पेटवून कुषणामाईचे पवित्र पाण्यात उभे राहिले असूनन्याय मिळेपर्यंत मागे न हटण्याचा इरादा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.एकंदरीत पुनर्वसन प्रश्नांवरून धरणातील पेटणार आहे.
दरम्यान धोम धरणाच्या उभारणीला पन्नास वर्षांचा कालवधी उलटून जावून सुध्दा पुनर्वसनाचा प्रश्न आज मितीला मार्गी लागलेला नाही, तरी ढम्म प्रशासनाला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. गेल्या पन्नास वर्षात देशात अनेक पक्षांची सरकारे आली, परंतु पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आल्यानेच पाण्यातील साखळी आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे जनजागरण समितीचे सदस्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
धोम धरणाच्या पाण्यात उभे राहून पुनर्वसन न झालेल्या लाभार्थींचे उपोषण सुरु
RELATED ARTICLES