Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातशे वर्षांहून अधिक काळ डौलाने फडकतेय वारकरी संप्रदायाची पताका

सातशे वर्षांहून अधिक काळ डौलाने फडकतेय वारकरी संप्रदायाची पताका

सातारा:श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार दि. 2 पासून सातारा जिल्ह्यात येत आहे. मंगळवार दि.2 रोजी लोणंद, बुधवार दि.3 रोजी तरडगाव गुरुवार दि. 4 रोजी फलटण तर शुक्रवार दि.5 रोजी बरड येथे मुक्काम होत आहे. त्यानिमित्ताने…
संतकृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत,तुका झालासे कळस भजन करा सावकाश, बहिणाबाईंनी वरीलप्रमाणे संतांच्या कृपेचा उल्लेख करताना ज्ञानेश्वरांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी विश्वाला गवसणी घालणारे अभिजात वाडःमय ज्ञानेश्वरीच्या रूपाने निर्माण केले. महाराष्ट्राचा अविभाज्य घटक झालेल्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबा माऊलीनीच रचला गेली सातशे वर्षांहून अधिक काळ वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकत आहे.या भक्ती पिठाचे मार्गदर्शक गुरु-माऊली म्हणून ज्ञानेश्वरांना अवघा या भूतलावरील वारकरी संप्रदाय वंदन करीत आहे.
ज्ञानोबा-माऊलींच्या पालखी सोहळ्यात वारकरी अतिउत्साहाने पंढरीची वाट चालत असतात. वारकरी सांगतात दिंडी सुरू झाल्यापासून या दिंडीत लोकांचा उस्फुर्त सहभाग आहे. आधुनिकतेचा कितीही पगडा लोकांवर राहिला असला तरी दिंडीतील धार्मिक ओढ माणसाला स्वस्थ बसू देत नाही. ज्ञानोबा-माऊली यामध्ये एक मोठी शक्ती समावली आहे. दिवसेंदिवस या भक्तिरसात डुंबणारांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.माऊलीची ओढ जगातील कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही.लोकांची दिंडीतील वाढणारी गर्दी हाच याचा मोठा पुरावा आहे.
गेली अनेक वर्ष अव्याहतपणे चालत आलेले आळंदी-पंढरपुर दिंडी सोहळा म्हणजे वारकरी मंडळीचा आनंद, ऊन-पाऊस कशाचीही पर्वा न करता या दिंडीसाठी तन-मन-धनाने या सोहळ्यात वारकरी स्वतःला वाहून घेतात.त्यात जात-पात-धर्म गौण असते. शेतवाडी-घरची व्यवस्था सर्वकाही योजनाबद्ध होते.तसेच पालखी सोहळ्यातील लाखो वारकर्‍यांचे व्यवस्थापन हा एक चमत्कारच आहे.पालखी सोहळा किंवा वारी हा केवळ भक्तीच नव्हे,तर व्यवस्थापन कौशल्याचाही उत्तम नमुना आहे. मदेह जावो अथवा राहो।पांडुरंगी दृढ भावोफ या निष्ठेने देशाच्या कानाकोपर्‍यातून अठरापगड जाती,धर्माचे सर्व स्तरातील वयोमानाचा व अधिकाराचा विचार न करता स्त्री-पुरुष या वारीमध्ये सहभागी होत असतात. संतांच्या पपालखीसमवेत दिंडीमध्ये सामील होऊन वारी करणे म्हणजे संतांच्या संगती मध्ये पंढरीला जाणे, अशी दिंडीतील भाविकांची श्रद्धा असते. दिंडीतील वारकर्‍यांचा मेळा पंढरीच्या वाटेवर चालताना गावोगावी भजन कीर्तनाच्या माध्यमातून नामघोषाने आणि सर्वांची मने पप्रफुल्लीत करीत एका वेगळ्या आनंदाचा वर्षाव करीत जात असतात माउलींच्या पालखी सोहळ्याचे आगमन म्हणजे गावातील उत्सव असतो.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular