सातारा:श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मंगळवार दि. 2 पासून सातारा जिल्ह्यात येत आहे. मंगळवार दि.2 रोजी लोणंद, बुधवार दि.3 रोजी तरडगाव गुरुवार दि. 4 रोजी फलटण तर शुक्रवार दि.5 रोजी बरड येथे मुक्काम होत आहे. त्यानिमित्ताने…
पंढररीची वारी या वैभवसंपन्न परंपरेमागे वारकर्यांची श्रद्धा असून, विठ्ठल भक्तीभोवती वारकरी संप्रदायाची गुंफण झाली आहे. वारीचा भक्ती सोहळा म्हणजे भक्तीचा महापूर महाराष्ट्राच्या लोकजीवनाला सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून देत पंढरीच्या वारीची परंपरा दिली.वारकर्यांचे जीवनाशी अतूट असा बंध निर्माण करणारी ही पंढरीची वारी, भागवत विचारसरणीचा आदर्श घेऊन प्रपंचात राहून परमार्थ आचरणाचा मार्ग वारकरी संप्रदायाने दाखवला यावर्षीचा सातारा जिल्ह्यातील आज बरड येथे शेवटचा मुक्काम असून उद्या हि वारी सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होणार आहे. साधु संत येती घरा तोची तोचि दिवाळी, दसरा अशी लोकांची श्रद्धा असते. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा पवार हे संत ज्ञानेश्वरांची थोर भक्त होते त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका घेऊन आळंदी ते पंढरपूर जाण्याची वारी केली. नंतर माऊलीच्या पादुका पालखीतून आणि आता पालखी रथामध्ये ठेवून आळंदी ते पंढरपूर हा पालखी दिंडी सोहळा पंढरीच्या वारीचे भव्य दिव्य स्वरूप प्राप्त झाले आहे.
आळंदी ते पंढरपूर 225कि.मी.प्रवास करून लाखो वारकरी पायी चालतात. दिंडीत सहभागी झालेल्या लाखो वारकर्यांना पंढरीची ओढ असते याचे कारण पंढरपूर हे वारकर्यांचे श्रद्धास्थान आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूरला संपणारा प्रापंचिक सोहळा, आपली धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा एकादशीला नित्यनियामाने विठ्ठल भेटीत जाणे म्हणजे वारी होय. आषाढी, कार्तिकी, माघी,चैत्री अशा पंढरीच्या चार प्रमुख वार्या असून लाखो भाविकांची विशेषता आषाढी कार्तिकी वारीस मांदियाळी असते.बहुसंख्य वारकरी पंढरीस आषाढी एकादशीस जमतात त्यासाठी देहू आळंदी येथून निघणार्या पालखीबरोबर पायी वारी करीत पंढरपूर येथे येतात. वारीमध्ये आषाढी असो व कार्तिक वारीव्रताचे आयुष्यभर अखंड आचरण करतात.वारी करण्यामुळे अनेक लाभ पदरी पडतात. निष्ठा बळकट होते, अंतरीचे प्रेम वाढते, संत सज्जनांच्या गाठीभेटी होतात. वारी म्हणजे उच्च पातळीवरील स्नेहसंमेलन होय. भक्तीप्रेम सुखाची अनुभूती म्हणजे वारी, असे वर्णन करता येईल. सात्विक आहार,सत्त्वाचरण,परोपकार आणि परमार्थ जगण्यातील विहित कर्तव्य पार पाडताना पांडुरंगाचशी एकरुपकृ व्हावे. नामस्मरण करावे असा साधा-सोपा परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे. पायी केल्या जाणार्या पंढरीच्या वारीची परंपरा पुंडलिका पासून सुरू होते. ज्ञानदेवांच्या घराण्यात वारीची परंपरा होती.भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व थरातील समाजाला त्यांनी एकत्र आणले, हेच व्यापक स्वरूप पुढे संत एकनाथ, तुकाराम महाराजांनी जपलले ही माझी आस जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी वारी चुको न दे हरी।्। अशी कळकळीची प्रार्थना एका अभंगात आहे.तर माझ्या के जीवाची आवडी।पंढरपूरा नेईन गुढी। पांडुरंगी मन रंगले।असे ज्ञानदेवांनी पंढरीच्या वारकर्यांचे कौतुकाने वर्णन केले आहे.
वारीचे भव्यदिव्य स्वरूप आजही कायम…
RELATED ARTICLES