केळघर: जावळी तालुक्याला वरदान ठरणा़र्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मी पहिल्यापासून प्रयत्नशील असून हे धरण पूणर् होईपयर्ंत स्वस्थ बसणार नाही. ज्याप्रमाणे सातारा तालुक्यात उरमोडी धरणाचे काम झाल्यानंतर तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढल्याने शेतकर्यांना फायदा झाला.त्याचप्रमाणे कायम टंचाईग्रस्त असलेल्या जावळी तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असणा़र्या बोंडारवाडी धरणासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यासाठी मी पुढाकार घेईन अशी ठोस ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे दिली.
बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने आज नांदगणे येथील स्वामी समर्थ मंगल कायार्लयात आयोजित 54 गावांतील ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोंडारवाडी धरण कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, उरमोडी धरण प्रकल्प सहायक अभियंता जे.आर.बरगे, पंचायत समिती सदस्य विजयकुमार सुतार, शिवसह्याद्रीचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानदेव रांजणे, राष्ट्रवादी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामभाऊ शेलार, सातारा बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, नगरसेवक अविनाश कदम, मोहनराव कासुरडे, आदिनाथ ओंबळे,हरीभाऊ शेलार, सागर धनावडे, बबनराव बेलोशे, जगन्नाथ जाधव, जयश्री शेलार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार भोसले म्हणाले, बोंडारवाडी धरण होणे जावळी तालुक्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. याची मला जाणीव आहे. त्यामुळे या धरणाच्या कामासाठी मी वेळोवेळी विधीमंडळात तसेच मंत्री स्तरावरही लेखी पत्रव्यवहार केला आहे. धरणासाठी विधानभवनाच्या पाय़र्यांवरही आंदोलन करून शासनाचे लक्ष्य वेधले होते. त्यामुळे बोंडारवाडी धरणास माझा विरोध आहे. या अफवा जाणीवपूवर्क पसरवल्या जात आहेत. यात काहीही तथ्य नाही. बोंडारवाडी धरण कृती समितीला बरोबर घेवूनच धरणाचा प्रश्न मारगी लावला जाईल.पुढील 50 वषार्ंती लोकसंख्या गृहीत धरून बोंडारवाडी धरण प्रकल्प होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री पेयजल योजनेतून होणार्या कामांमुळे बोंडारवाडी धरणाला कुठलाही फरक पडणार नाही. गेले 10 वर्ष जावळी तालुक्याने माझ्यावर भरभरून प्रेम केले असून मतदारांच्या मागणीनुसार जावळीतील प्रत्येक वाड्यावस्त्यांवर विकासकामे केली आहेत. त्यामुळे मला निवडणुकीची भिती नाही.
प्रास्ताविकात निमंत्रक विजयराव मोकाशी म्हणाले, कृती समिती ही निष्पक्षपणे काम करीत असून धरणासाठी ज्यांचे ज्यांचे सहकायर् मिळेल त्यांच्याकडून ते घेतले जाईल.आमदार भोसले यांनी तालुक्यासाठी महत्त्वाचा असलेला हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करावेत.बोंडारवाडी धरणाच्या सवेर्क्षणाचे काम आधिकाऱयांनी तातडीने करावे अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी ज्ञानदेव रांजणे, मोहनराव कासुरडे, आदिनाथ ओंबळे, हरीभाऊ शेलार, सागर धनावडे आदींची भाषणे झाली. यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, कृती समितीचे सभासद, मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुका दोन महिन्यांवर येवून ठेपल्या असून आमदार भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चचार् सुरू आहे.त्यासंबंधी बोलताना आमदार भोसले म्हणाले, राजकारणात काय होईल ते आताच सांगता येत नाही. मात्र जर वेगळा निमर्य घेण्याची वेळ आली तर सवार्ंना विश्वासात घेवून निणर्य घेतला जाईल, या बैठकीत कायर्कत्यार्ंनी बोंडारवाडी धरण मारगी लागण्यासाठी जनतेने जोर लावला तर प्रसंगी आमदारांनी पक्ष बदलावा अशी मागणी केल्याने पक्ष बदलण्याचीही तयारी ठेवू त्यास आमदार भोसले यांनी हासून प्रतिसाद दिला.त्यामुळे आमदार भोसले राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जातील काय याबाबतत तकर्वितर्क लढवले जात आहेत.
बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील : आ.शिवेंद्रसिंहराजे
RELATED ARTICLES