सातारा: सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील एक चमत्कार आहे. वारीत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी होतात.
संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत सोयराबाई, संत बहिणाबाई यांनी संत परंपरेत झोकून देऊन वारकरी संप्रदायातील महिलांना दिशा दिली आहे. संत बहिणाबाई यांचे काव्य हृदयाचा ठाव घेणारी आहे. त्यांची अमृतवाणी ज्ञानोबा-तुकोबांच्या अभंगवाणी सारखीच आहे. त्यांच्या काव्याचे नाते सातशे वर्षापूर्वी ताटीचे अभंग करणार्या संत मुक्ताबाईशीही आहे. माझी मुक्ताई या नावाची त्यांची कविता आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरादी भावंडांना संन्याशाची मुले म्हणून सगळे हिणवू लागले अशा मुलांची तोंडे पाहू नयेत असे म्हणू लागले. मग ज्ञानोबारायांना राग आला. लाजेने मान खाली घालून ते घराचा दरवाजा(ताटी) बंद करून बसले. यावेळी ज्ञानेश्वरांची समजूत काढली ती छोट्या मुक्ताईने. मुक्तिईने ज्ञानेश्वरांची काढली समजूत म्हणजेच हे ताटीचे अभंग होय हे तिटीचे अभंग कसे आहेत, ते सांगताना बहिणाबाई म्हणतात, मघेती हिरीदीचा (ह्रदयाचा) ठावा।ऐका ताटीचे अभंग्।एका एका अभंगात।उभा केला पांडुरंग्।्।फ हे ताटीच्या अभंगाचे आजच्या भाषेत बोलायचे तर सुंदर समीक्षण होय. एवढे सुंदर समर्पक विचार इतरत्र क्वचितच पहावयास मिळतील. या महिला संत परंपरेचा आदर्श घेऊन बहुसंख्य महिला मार्गक्रमण करीत असताना पहावयास मिळतात.या महिलांच्या खांद्यावर पताका असतात, डोक्यावर हंडे-तुळशी वंदावन घेऊन चाललेल्या तसेच रंगीबेरंगी लुगडे, नऊवारी,सहावारी साड्या नेसलेल्या,पंजाबी पोशाख परिधान केलेल्या महीला वारीत दिसून येतात.
या वारीत चालणार्या महिलांमध्ये परदेशी पर्यटक तसेच अभ्यासक मुलीही दिसतात,कुणी शिक्षिका, कुणी डॉक्टर ,कुणी प्राध्यापक, कुणी गृहिणी,अशा पुष्कळ कार्यक्षेत्रातील महिला दिसतात. पंढरीच्या वारीची मुक्कामाचे ठिकाण ठरलेली असतात.कामाची वाटणी ठरलेले असते,बहुतेक दिंड्या मध्ये महिला धान्य निवडतात, भाज्या निवडतात आणि स्वयंपाक ही करतात.या महिला दिंडीमध्ये फुगड्या खेळतात तसेच गातात अभंग,भारुड आणि ओव्या म्हणतात. दिवसभर चालून दमलेल्या असल्या तरी दनादना फुगड्या खेळणार्या एकीकडे त्यांच्या चपळपणाचे कौतुक वाटत राहते आणि दुसरीकडे मोकळा आनंद अनुभवण्याची त्यांची नवलाई.काय काम करतात त्या इतर वेळी? काय कमवतात? पैशांची व्यवस्था कशी करतात? घराची व्यवस्था कशी करतात? 19 ते 20दिवस घरापासून दूर राहतात त्यांच्यासाठी हे येणे किती अवघड असतं. त्यांची वारीला येण्याची ओढ समजून घेतली पाहिजे.
अखंड निघणार्या पंढरीच्या वारीत महिलांचा सहभाग
RELATED ARTICLES