म्हासुर्णे प्रतिनिधी ः सातारा सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा महाबळेश्वर राज्यमार्गाचे काम सध्या चोराडे – खेराडे(वांगी) परिसरात सुरू असून हे काम जुन्यामार्गावरील डांबरीकरण न उकरताच ठेकेदारांकडून उरकले जात असुन हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा अरोप स्थानिक ग्रामस्थांकडून व वाहनचालकांकडून केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती सातारा-सांगली जिल्ह्यातून जाणारा विटा-महाबळेश्वर या राज्यमार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे या मार्गावरील नव्याने पुलाचे बांधकामही पूर्णत्वाकडे चालले आहे . या राज्यमार्गाचे काम उत्कृष्ट व्हावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी स्वखर्चाने मार्गालगत व मार्गामध्ये येत असलेली अतिक्रमणे काढली आहेत .
ग्रामस्थांकडून या राज्य मार्गाला सहकार्य होत असतानाच
ठेकेदाराकडून या मार्गावर असलेले जुने डांबरी रस्ते तसेच ठेवून फक्त साईडपट्टय़ा भरून काम उरकत असलेला आरोप स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक करत आहेत अनेक ठिकाणी मार्ग पूर्ण उकरला आहे तर अनेक ठिकाणी पूर्वीचे काम तसेच ठेवल्यामुळे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचाही वाहनचालकांकडून बोलले जात आहे .
केंद्र सरकारच्या अंतर्गत हे राज्यमार्गाचे काम सुरु असल्याने स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे पदाधिकारी या मार्गाच्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदार साहजिकच कोणीही अधिकारी फिरकत नसल्याने काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करून काम करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून होत आहे .
:- कित्येक वर्षांनी या भागातील रस्त्यांना राज्यमार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे तरी केंद्राकडून या मार्गाच्या पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. तरी राज्यमार्गाचे काम चांगले व्हावे ही स्थानिक ग्रामस्थांची अपेक्षा आहे.