पाटण:- पाटण मध्ये नवीन बिगुल वाजायला लागलाय.. सगळीकडे विकास विकास म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौले आहेत का काय अस वाटायला लागलय. पाच वर्षात अठराशे कोठीची कामे झाल्यावर घरावर सोन्याची कौले नाहीतर काय येतील. सत्यजित दादा तुमच अभिनंदन कारण अठराशे कोठी रूपयेचा पंचनामा तुम्ही काढला आहे. तो अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही जनतेसमोर आणता आहात. कोणावर कधी वैयक्तिक ठिका करत नाही. पण कोणी फसव्या गोष्टी दाखवत असेल त्याला आरसा दाखविण्याचे काम आपले आहे. हेच आता करुन दाखवा आणि खोट्याला उघडे पाडा. असे आहवान खा.डॉ. अमोल कोल्हे यांनी पाटण येथे शिवस्वराज्य यात्रे वेळी सभेत बोलताना केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील, जेष्ठ नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, अमोल मेटकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेजस शिंदे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. डॉ. अमोल कोल्हे आपल्या भाषणात पुढे म्हणाले महाराष्ट्रातील दोन यात्रा महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण हे सांगण्यासाठी आहेत. तर शीवस्वराज यात्रा हि महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्यासाठी, माता-भगणीनां सन्मानाची वागणूक देण्यासाठी आणि तरुणांच्या डोळ्यासमोर भविष्याचे चित्र निर्माण करण्यासाठी आहे. जिथ शेतकऱ्यांनच्या भाजीच्या देटाला हात लावण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. ते रयतेचे राज्य पुन्हा आणन्यासाठी शिवस्वराज यात्रा आहे. मागील पाच वर्षात सोळा हजार शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या. माता – भगणींच्या कपाळावरच कुंकू पुसल गेल. आता सांगा ३०२ चा गुन्हा कोणाच्या नावावर दाखल करावा. मुख्यमंत्र्यांच शहर असलेल्या नागपूर शहरात दर तीन – चार दिवसाला एक खून होतोय, एक बलात्कार होतोय. आणि दर एक दिवसाला अपहरणाची घटना घडतेय. २०१४ बिंबीच्या देठापासून ओरडून सांगत होता. त्यानीच आता याच प्रश्नांची उत्तरे सांगा कुठ नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.? असा प्रश्न त्यांनी यावेळी युती सरकारला केला.
डॉ. अमोल कोल्हे पुढे म्हणाले सत्यजितसिंह पाटणकर यांचे अभिनंदन करेन कारण त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात तरूणाई उभी आहे. लाथ मारील तिथ पाणी काढण्याची ताकद तरुणाईची असते. अशक्य ते शक्य करून दाखविण्याची ताकद तरुणाईची असते. आणि समोर कोणी आला त्याला शिंगावर घ्यायची ताकद देखील तरुणाईचीच असते. हि ताकद येथे जमलेल्या तरुणाई कडून आज दिसत आहे.
कौंग्रेस – राष्ट्रवादी च्या काळात अरबी समद्रातल स्मारक मंजूर झाल. मात्र गेल्या पाच वर्षात केवळ स्मारकाच भूमिपूजन केलत मात्र या स्मारकाची साधी विट तुम्हाला रचता आली नाही. २०१४ पासुन तुम्हाला ऐवढी मस्ती आली देवांचा राजा इंद्र तर काय महाराष्ट्राचा राजा देवेंद्र.. काल आज आणि उद्या राजेपद फक्त एकाच माणसाला आम्ही दिलय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनाच.
महाराष्ट्राची आवस्था काय आहे. या युतीच्या सरकारने तरुणाईच्या कपाळावर बेरोजगारीचा शिक्का मारून दाखविले आहे. कोणीतरी मैसेज पाठवला दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र दोन्ही मिळुन तरुणाईच्या बेरोजगारीचे केंद्र. गेल्या पाच वर्षात देशात १ लाख ४२ हजार कंपन्या बंद पडल्यात ४५ वर्षात कधी नव्हती ऐवढी बेकारी आज आहे. बंद पडलेल्या कंपन्यामधून महाराष्ट्रात १० लाख बेरोजगार होणार आहेत. राष्ट्रवादीच्या झेंड्याबरोबर भगवा जेंव्हा फडफडतो तेंव्हा उर अभिमानाने भरून येते. रक्त अंगात सळसळत तेंव्हा विरोधकांच्या पोठात दुखायला लागत.
पाटण मध्ये वेगळ काही बोलण्याची गरज नाही. सगळीकडे विकास विकास म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सोन्याची कौले आहेत का काय अस वाटायला लागले. पाच वर्षात अठराशे कोठीची कामे झाल्यावर घरावर सोन्याची कौले नाहीतर काय येतील. सत्यजित दादा तुमच अभिनंदन कारण अठराशे कोठी रूपयेचा पंचनामा तुम्ही काढला आहे. तो अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्ही जनतेसमोर आणता आहात. कोणावर कधी वैयक्तिक ठिका करत नाही. पण कोणी फसव्या गोष्टी दाखवत असेल त्याला आरसा दाखविण्याचे काम आपले आहे. पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात माथाडी बांधव आहेत. त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे पाप देखील या युतीच्या सरकारने केले आहे. महाराष्ट्राला फसवीणाऱ्याला मातीत घाडायच काम आपल्याला करायच आहे. महाराष्ट्रात आलेल्या पूरपरस्थितीवर या सत्ताधाऱ्यांना किती आपुलकी आहे ती आपण पाहिलत.? आठ दिवसांनी पालकमंत्री पुर पाहायला आलेत. मुख्यमंत्र्यांनी हवाई पाहणी केली. तर काही मंत्री पुरात सेल्फी काढण्यास वेस्त होते. केंद्राने मदत करताना कर्नाटक, केरला येथे तात्काळ मदत दिली. पण महाराष्ट्राला मदत दिली नाही. कारण त्यांना निवडणूका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या मदतीची जाहिरात करायची आहे. निवडणूकीच्या तोंडावर ऐवढ्या घोषणा करणाऱ्या सरकारचे हात चार वर्षे कोणी धरले होते का.? महिलांना देखील पवार साहेबांनी ५० टक्के आरक्षण देवून मान सन्मान मिळवून दिला. आज त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ महिलांच्या वर आली आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्वांनी एकत्र येऊन रयतेचे राज्य आणन्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने खंबीर पणे उभे रहा. असे आहवान शेवटी खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
यावेळी आ. शशिकांत शिंदे, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, अमोल मेटकरी, यांची भाषणे झाली. दरम्यान या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात केरापुलापासुन झाली आसता ती झेंडा चौक, लायब्ररी चौक मार्गे पाटण शहरातून बी.डी.कौलेज मैदानावर आली. तिथे या यात्रेचे सभेत रुपांतर झाले. या सभेत मोठ्या संख्येने महिला वर्गाबरोबर, तरुणाई तसेच नागरिक उपस्थित होते.