सातारा: अपघात अथवा आजारामुळे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी मोङ्गत कृत्रीम हात व पाय (जयपूर ङ्गूट) बसवण्याच्या कर्तव्य सोशल ग्रूपच्या शिबीरात तब्बल 160 दिव्यांग बांधवांना कृत्रीम अवयवांचे मोङ्गत वाटप करण्यात आले. पर्यावरण, निसर्ग रक्षणाबरोबरच जनसामान्यांची सेवा करण्याचे काम कर्तव्यच्या माध्यामातून अविरतपणे सुरु आहे. मोतीबिंदू शिबीर असेल किंवा मोङ्गत जयपूर ङ्गूट वाटप शिबीर असेल, अशा विविध प्रकाराच्या आरोग्य विषयक शिबीरातून पिडीत लोकांना आपले जीवन आनंदाने जगता यावे, यासाठी प्रयत्न केले जातात. कर्तव्यच्या नुकत्याच झालेल्या शिबीरात सातारा जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरुन असंख्य दिव्यांग बांधव आले होते. या सर्व बांधवांना कृत्रीम हाप, पाय, कॅलिपर, व्हील चेअर, तीनचाकी सायकल मोङ्गत देण्यात आले असून या माध्यामून या सर्वांचे जीवन सुसह्य करता आले, याचे कर्तव्य ग्रुपला मनस्वी समाधान वाटत आहे, असे प्रतिपादन ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.
पुष्कर मंगल कार्यालय, विसावा नाका येथे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्तव्य सोशल ग्रुप, साधूवासवाणी मिशनच्या इनलॅक्स आणि बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अपघात अथवा आजारामुळे अपंगत्व आलेल्या लोकांसाठी मोङ्गत कृत्रीम हात व पाय (जयपूर ङ्गूट) बसवण्याच्या शिबीरात आवश्यक अवयवांचे माप दिलेल्या अपंग बांधवांना मोङ्गत जयपूर ङ्गूट वाटपप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोलत होत्या. यावेळी इनलॅक्स बुधराणीचे मिलींद जाधव, सुशिल ढगे, सलील जैन, राठोड आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीरात 160 रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार हात, पाय, व्हील चेअर, वॉकर, कुबड्या, कॅलीपर आणि तीनचाकी सायकलचे मोङ्गत वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या की, गेली 14 वर्ष कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून मानवाच्या आरोग्याबरोबरच निसर्गाचे आरोग्य जपण्याचे कार्य अखंडपणे सुरु आहे.
ग्रुपच्या माध्यमातून घेण्यात येणार्या मोतीबिंदू शिबीरामुळे आतापर्यंत हजारो लोकांना नवी दृष्टी मिळाली आहे तर, सलग 11 व्या जयपूर ङ्गूट वापट शिबीराच्या माध्यमातून सुमारे 2 हजाराहून जास्त दिव्यांग बांधवांना कृत्रीम अवयवांचे वाटप करण्यात आले आहे. ज्या बांधवांना हात नाही, पाय नाही त्यांना या शिबीराचा लाभ झाला आहे. ज्यांना कृत्रीम हात, पाय बसवले आहेत, मात्र दररोजच्या कष्टामुळे, कामामुळे त्यांच्या या अवयवांची झीज झालेली असते, त्यांनाही या शिबीरातून नवीन अवयव मिळाले आहेत.
बहुतांश दिव्यांग बांधव शेतकरी अथवा कष्टकरी असतात. त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांच्या दैनंदीन कामकाजात त्यांच्या शरीराला या कृत्रीम अवयवांमुळे मदत मिळावी आणि त्यांचे दैनंदीन जीवन सुखकर व्हावे, या उद्देशाने या शिबीराचे आयोजन केले जात असून त्याचा लाभ घेण्यासाठी आज असंख्य पुरुष आणि महिला उपस्थित राहिल्या याबद्दल सौ. वेदांतिकाराजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तुमच्या उपस्थितीमुळे कर्तव्य ग्रुपची सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा दिवसेंदिवस वृध्दींगत होते, असेही सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.
शिबीर यशस्वी करण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुपच्या विजय देशमुख, दिपक भोसले, विलास कासार, राजा महाडिक, चंदन घोडके, रवी पवार, दिलावर शेख, जितेंद्र मोहिते, ओमकार परदेशी, सुहस वहाळकर आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
दिव्यांगांचे जीवन सुसह्य करता आल्याचे समाधान: सौ. वेदांतिकाराजे
RELATED ARTICLES