पुसेसावळी : स्वातंत्र्य चळवळीचे महत्व कमी करु नका हुतात्म्यांनी एकीने व त्यागाने स्वातंत्र्य मिळवले आहे, त्यांच्या कर्तुत्वाला कलंक न लावता पुढील कार्यक्रम हा एकत्रीत साजरा करा मत असे आ.बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते जयरामस्वामींचे वडगाव येथील हुतात्मा स्मारकात आयोजित केलेल्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमात बोलत होते ,
यावेळी माजी.आ. प्रभाकर घार्गे, मा.जि.प अध्यक्षा मा.भाग्यश्री भाग्यवंत,जि.प.सदस्य समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, माजी समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, बंडा गोडसे, सभापती कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे, पं.स.सदस्या रेखा घार्गे,
मार्केट कमेटी माजी सभापती सी.एम.पाटील,माजी उपसभापती जोतीराम थोरात,माजी उपसभापती चंद्रकांत पाटील,सरपंच संतोष घार्गे, उपसरपंच सुर्यकांत कदम यांची उपस्थिती होती.
प्रारंभी हुतात्मा ज्योत प्रज्वलित करण्यात आली व मान्यवरांनी हुतात्मा स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले.
यावेळी आ.प्रभाकरजी घार्गे यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की हुतात्म्यांचा कार्यक्रम दोन वेळा साजरा झाल्याची खंत व्यक्त केली आणि अनेक वर्षांपासून क्रांती प्रतिष्ठान हा कार्यक्रम करत आले असुन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे,
दरम्यान विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिकांचे उत्तराधिकारी उपस्थित होते. तहसिलदार अर्चना पाटील गटविकास अधिकारी रमेश काळे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वडगावातील विविध संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक लक्ष्मण घार्गे यांनी केले.आभार वसंतराव घार्गे यांनी मानले.