Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीबहुमताच्या जोरावर देशात हुकुमशाही निर्णय ; मतदारांनी विधानसभेला  विचारपुर्वक मतदान करावे :...

बहुमताच्या जोरावर देशात हुकुमशाही निर्णय ; मतदारांनी विधानसभेला  विचारपुर्वक मतदान करावे : प्रकाश आंबेडकर

 

कराड : लोकशाही देशात एखांद्या पक्षाला मतदारांनी मोठे बहूमत दिले तर तेथे हुकूम शाही प्रमाणे निर्णय घेतले जातात. तीच परस्थिती  सध्या देशात निर्माण झाली आहे. तेंव्हा होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी जागृतपणे मतदान करावे. असे वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश अंंाबेडकर यांनी सांगुन आमचा लढा राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी नाही तो भाजपशी असल्याचे ते म्हणाले. ते येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्यसचिव सचिन माने, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते. भरत लोकरे, अनिल सावंत यांच्यासह आघाडीचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते. आंबेडकर पुढे म्हणाले, भाजपने सत्येचा गैरवापर चालविला आहे. अनेकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. जाणारेही सज्जन नाहीत. मग सज्जन म्हणायचे कोणाला असा सवाल करून ते म्हणाले. आज देशात मोठ्या प्रमाणात मंदीची लाट आली आहे. त्याला भाजपची धोरणे कारणीभुत आहेत. उद्भभवलेल्या मंदीचा फटका कारखानदार, सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. थोडयाच कालावधीत कापुस, ऊस शेतकर्‍यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. काश्मिरच्या प्रश्‍नावर चर्चाकरून निर्णय घ्यायला हवा होता. मात्र  तसे झाले नाही. आज काश्मिरची परिस्थिती गंभीर आहे. या अशांत परस्थितीचा त्रास देशाला सोसावा लागणार आहे. मंदीच्या परस्थितीमुळे अनेक छोटया मोठया उद्योजकांनी देश सोडला आहे. जे उरले आहेत ते उद्योग धंद्यात गुंतवणुक करायला तयार नाहीत. केंद्र सरकारने अमेरिकेतील कापसाला   भारतात विक्रीसाठी परवानगी दिल्याने देशातील कापसाच्या किंमती पडल्या आहेत. आज आपल्या  कापसाचा दर तीन हजार रूपये क्विंटल झाला आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. काँगे्रसकडे  विधानसभेच्या निवडणुकीसाठी 144 जागांची मागणी केली होती. मात्र ही आमची मागणी त्यांनी धुडकावुन लावली त्यामुळे आम्ही राज्यातील सर्वच्या सर्व 248 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज कॉग्रेंसची आवस्था कॅन्सरग्रस्त झाली आहे. तर राष्ट्रवादी मृत्यूशय्येवर आहे. त्यांच्याबरोबर आघाडी शक्य नाही. विधानसभेला भाजप हेच आमचे टारगेट असेल  तेंव्हा सुज्ञ मतदारांनी  विचारपुर्वक  मतदान करून राज्य तरी वाचवावे असे आंबेडकर म्हणाले, व वंचित बहुजन आघाडीत  कोणतीही बिघाडी झाली नाही. लक्ष्मण मानेंच्या जाण्यांने मोठा फरक पडणार  नाही.  कोळसे -पाटील तर आमच्या आघाडीत नव्हतेच. असे म्हणुन त्यंानी एम.आय.एम. पक्ष विधानसभेच्या निवडनुकीत आमच्या सोबत असणार असल्याचे सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular