सातारा : महाजनादेश यात्रेनंतर भाजपने जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचण्यासाठी 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महासंकल्प अभियान राबवले जात आहेत. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मतदार राजांचा काय संकल्प असणार आहे याची माहिती संकलित करण्याचे प्रत्यक्ष 25 सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. महासंकल्प अभियानाची सुरवात स्व. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात येणार आहे. हे अभियान बूथ स्तरावर चालणार असून पक्षात सक्रीय असलेले प्रदेश, जिल्हा, मंडल, शक्ती केंद्र व बूथ स्तरावरील कार्यकर्ते घरोघरी जाऊन नवमहाराष्ट्राचे नऊ संकल्प पोहोचवणार आहेत.
या संदेशाचे मुख्यमंत्र्यांसाठी संकलन केले जाणार आहे. जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी प्रभातला दिलेल्या माहितीनुसार महासंकल्प अभियान हे चार टप्प्यात राबवण्यात येणार आहे.20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या दरम्यान महासंकल्प अभियानाच्या पत्रकाचे भाजप सदस्यांना वितरण 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दरम्यान बूथ प्रमुखांच्या बैठका, 25 सप्टेंबर महाराष्ट्र स्तरावर अभियानाची सुरवात, व 2 ऑक्टोबर पासून लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते यांचे व्यापक संपर्क अभियान सुरू होणार आहे. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे पत्र व नव संकल्प मतदारांना पोहोच करायचे आहे. त्या पत्रकाच्या तळाला जनतेच्या संदेशाची जागा देण्यात आली आहे. संदेश वहन करणार्या सदस्याने 9227192271 या क्रमांकावर मिस कॉल द्यायचा आहे. विधानसभा प्रदेश कार्यालयातून या अभियानाची माहिती घेतली जाणार आहे.
चौकट- सातारा जिल्हयात भाजपच्या आक्रमक महत्वाकांक्षा उघड झाल्या आहेत. अगदी सातारा व वाई सारख्या सेनेच्या पारंपारिक मतदारसंघावर दावा सांगत भाजपची स्वबळाची चाचपणी केली जात आहे. मात्र मतदार राजाचा कौल काय? याचा सावध अंदाज संकल्पना म्यातून घेतला जाणार आहे.
भाजपचे मतदारापर्यंत पोहचण्यासाठी 20 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महासंकल्प अभियान
RELATED ARTICLES