वडूज: रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळे शेतीचा पोत खराब होण्याबरोबर मनुष्य व प्राण्याचा आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. अश्या परस्थितीत सेंद्रीय शेती करणे ही काळाची गरज आहे. असे मत सेंद्रीय शेतीतज्ञ विलासराव करे यांनी व्यक्त केले.
सिध्देश्वर कुरोली (ता. खटाव) येथे एस. व्ही. अॅग्रो सोल्यूशन च्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रीय शेती मार्गदर्शन व उपाययोजना कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी कंपनीचे मार्केटींग डायरेक्टर महादेव बरडकर, वरिष्ठ अधिकारी आबासाहेब नाळे, शिक्षक समितीचे सरचिटणीस नवनाथ जाधव, धनंजय क्षीरसागर, सचिन शेंडे, विक्रम जाधव, शुभम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. करे यांनी ऊसाचे उत्पादन एकरी 100 टन कसे घ्यावे. भाजीपाला सेंद्रीय पध्दतीने कसा पिकवावा, सेंद्रीय मालास उपलब्ध बाजारपेठा यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. श्री. बरडकर व नाळे यांनी दुष्काळी भागातील शेतकर्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी एस. व्ही. कंपनीमार्फत देण्यात येणार्या सुविधासंदर्भात सविस्तर माहिती दिली. नागाचे कुमठे येथील जितेंद्र फडतरे यांनी ऊसाची पाचट पेटविल्याने गांडुळाचा नायनाट होत असल्याचे सांगितले. त्यामुळे पाचट पेटवण्याऐवजी शेतकर्यांनी ती जमीनीत कुजवण्याचे आवाहन केले.
प्रगतशील शेतकरी अर्जुन देशमुख, विक्रम जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. धनंजय क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विकास सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष एम. एन. देशमुख, किसनराव जाधव, ग्रा.पं.सदस्य अॅड. अनुज देशमुख, छगन पाटोळे, विजय काळे, विजय मांडवे, जालिंदर जाधव, सुभाष फडतरे, सुनिल बनसोडे, स्वानंद गोसावी, अनिरुध्द लावंगरे, भानुदास काळे, ज्ञानदेव काळे आदिंसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.
सेंद्रीय शेती काळाची गरज: करे
RELATED ARTICLES