वडूज: माण-खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे, तसेच ङ्ग आमचं ठरलयं म आघाडीचा एक उमेदवार असे तीन पर्याय आत्तापर्यंत होते. आता माण-खटाव परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून चौथा पर्याय देण्याबाबत चर्चा आहे. यासंदर्भात मुंबई येथे प्रमुख कार्यकत्यांचा मेळावा झाला.
या मेळाव्यात धनाजी सावंत, बळीराम नेटके, बबन पवार, भोजलीग कळेल यांच्या पैकी एक उमेदवार आघाडीच्या माध्यमातून देण्याबाबत साधक-बाधक चर्चा झाली.
निवडणुकीत विजयासाठी सर्वजण प्रयत्न करतील असे ठरवण्यात आले. या मेळाव्यात मा आमदार याच्या कार्यपद्धती वर सर्वानी विरोध केला. गेल्या अनेक वर्षात माण व खटाव तालुका विकसित झालेला नाही माण मधून आज पर्यत निवडून दिलेले नेतृत्व विकास करू शकले नाही त्या मुळे आज तालुक्यातील जनतेला स्थलांतरित करावे लागेल आहे
आज वसई विरार सारख्या शहरात माण मधील जनता आपल्या उदरनिर्वाह साठी उघड्यावर वास्तव्य करते हे या तालुक्यातीत लोकप्रतिनिधी चे अपयश मानावे लावेल. जनतेने ही निवडणूक हातात घेऊन तालुक्यात परिवर्तन करावे या साठी परिवर्तन विकास आघाडी एक सामान्य जनतेतून उमेदवार ठरवेल व तो विजयी होईल असा विश्वास सर्वानी व्यक्त केला.
माण मतदारसंघात माण-खटाव विकास आघाडीचा चौथा पर्याय
RELATED ARTICLES