फलटण: फलटण तालुक्यात काल रात्री पडलेल्या परतीच्या दमदार पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले आहे अनेक रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूकही बंद होती फलटण बस स्थानकात चिखल झाल्याने एसटी बस चिखलात अडकल्या होत्या.
फलटण तालुक्यात परतीचा पाऊस जोरदार सुरू झाला असून काळ मध्यरात्री पावसामुळे बर्याच ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती अनेकांच्या शेतात पाणी घुसले होते पावसामुळे वाटेतील ओढ्यांना आलेल्या पाण्यामुळे फलटण कांबळेश्वर, फलटण सावंतवाडा, फलटण मांडवखडक, बोडके वस्ती या मार्गावरील बससेवा दुपारपर्यंत बंद होती सोनवडी येथील ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती मांडवखडक येथील एक पूल वाहून गेलेला आहे. गिरवी ते बोडकेवाडी दरम्यानचा एक पूल वाहून गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मांडवखडक येथे एक मोटर सायकल पाण्यात वाहून गेली सदर व्यक्तीस वाचविण्यात यश आले जीवित हानी झालेली नाही मांडवखडक येथील बंधारा आणि पाझर तलाव पूर्णपणे भरून वाहिल्यांने बाणगंगा धरणातील पाण्याचा साठा वाढलेला आहे. धरण पूर्णपणे भरण्यास फक्त चार ते पाच फुट बाकी आहे.बर्याच दिवसानंतर दालवडी येथे बाणगंगा नदीच्या पुलावरून पावसाचे पुराचे पाणी वाहिले. आसपासच्या परिसरातून ओढ्यांना आणि नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे बाण गंगा नदीला पूर आला आहे फलटण येथे नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती जवळपास 10 वर्षानी फलटण शहरात बाणगंगा नदीला पूर आला आहे. बाणगंगा नदीला पूर आल्याने शहरातील शनिनगर परिसरातील नदीकाठच्या अनेक घरात पाणी शिरले होते अनेकांचे संसारपयोगी साहित्याचे त्यामुळे नुकसान झाले आहे .पुरामुळे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पाहणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजीत राजे नाईक निंबाळकर,स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे,नगरसेवक अजय माळवे,पांडुरंग गुंजवटे,किशोरसिंह नाईक निंबाळकर,सुधीर अहिवळे,अमरसिंह खानविलकर, नगरसेविका प्रगती कापसे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद नेवसे आदी पदाधिकार्यांनी केली आहे.उपळवे येथे ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे .कुरोली भागात विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. पर्यायाने गावातील पिण्याचा प्रश्न तसेच धान्य पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला आहे. पाऊस पडल्यामुळे हवेतील उष्मा कमी होण्यास मदत झाली आहे. ओढे,नाले, तलाव भरून वाहिल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.या पावसामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.
दमदार पावसामुळे फलटणला अनेक भागात नुकसान
RELATED ARTICLES