फलटण: ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाचे केलेल्या कामामुळे वंजाळी तलाव फुटून शेतकर्यांचे लाखो रुपये नुकसान झाले असून संबंधित ठेकेदाराकडून ही नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी उपळवे येथील शेतकर्यांनी केली आहे.
गेली तीन महिने पावसाळा सुरू होऊन मात्र फलटण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने आपले पशुधन व शेतातील पिके वाचवण्यासाठी दुष्काळी भागातील शेतकर्यांनी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे मागणी केल्याने उपळवे ता.फलटण येथील वांजाळी तलावात धोम बलकवडीचे पाणी सोडले होते, या नंतर वांजळी तलावातून पाणी गळती सुरु झाली होती. याबाबत तलावाचे निकृष्ट दर्जाचे काम केले असल्याच्या तक्रारी येथिल शेतकर्यांनी केल्या होत्या मात्र या कडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने काल सोमवार दि.23 रोजी हा तलाव फुटल्याने 100 ते 150 एकर क्षेत्रावर असणार्या बाजरी,मका,ऊस व जनावरांना केलेला चारा वाहून गेला आहे या मुळे एका बाजूला दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्यांना या ठेकेदाराने केलेल्या निकृष्ठ कामामुळे नऊ महिन्यातच हा तलाव फुटून पाणी तर वाया गेलेच पण एवढया तीव्र दुष्काळात वाचवलेली पिके मात्र भुईसपाट झाली असून त्या ठिकाणच्या दोन विहिरींचे ही नुकसान झाले आहे.
सन 1975 साली बांधलेल्या या तलावामुळे उपळवे व जाधवनगर या दोन्ही ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. या मुळे या नुकसानीचा पंचनामा करून संबंधित ठेकेदाराकडून वसूल करावा अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी केली आहे.सदर घटनास्थळी दिंगबर आगवणे यांनी भेट देवुन नुकसानीची पाहणी केली.
वंजाळी तलाव फुटून शेतकर्यांचे लाखो रुपयांचेे नुकसान
RELATED ARTICLES