कराड: कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा येथील पंकज मर्ल्टी पर्पज हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्यात सर्व उपस्थितीत काँग्रेसपक्ष पदाधिकार्यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेची पोटनिवडणुक न लढवता कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन उमेद्वारी करावी अशी अग्रही भुमिका मानली. बाबांनीही पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मताशी सहमती दर्शविली.
कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील पंकज मल्टीपर्पज हॉलमध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्तेंयांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळीक, युवा नेते शिवराज मोरे, मलकापुर न.पा.च्या अध्यक्षा नलिनी येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, अजितराव पाटील चिखलीकर, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, झाकीर पठाण, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री, नागपुर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक म्हणाले आज देशाबरोबरच पक्ष अडचणीत आहे. होणारी विधानसभेची निवडणुक महत्वाची आहे या निवडणुकीसाठी काँगे्रसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुट ठेवुन काम करावे. अलिकडे ज्यांना आपलीच खात्री नाही. असे लोकच पक्ष सोडुन गेले आहेत. त्यांनी निवडणुकीआधिच पक्ष सोडला हे बरे झाले. कारण पक्षातील किड गेली. जे राहिले आहेत ते सच्चे मावळे आहेत. या मावळयांनी निवडणुक काळात पक्षाची बांधिलकी ठेवुन काम केल्यास परिवर्तन अटळ आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण हे अभ्यासु विश्वासू नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महाराष्ट्रासह सातारा जिल्हा विशेषत: कराड तालुक्याचे नंदनवन केले आहे. अशा नेतृत्वाच्या पाठीशी राहुन त्यंाना भरगोस मतांंनी विजयी करावी. असे सांगुन येथील पक्ष पदाधिकारी कार्यकत्यार्ंची इच्छा पक्षश्रेष्टींना कळविण्यात येईल असेही ते म्हणालेे.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. देशात आज आणीबाणी सारखी परस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही धोक्यात आली आहे. सर्वांना ईडी-सीबीआयचा धाक दाखवला जात आहे. त्यासाठी होणार्या विधानसभा व लोकसभेच्या पोट निवडणुकीत सर्वांनी विचारांनी मतदान करावे. लोकशाहीत विरोध हवा तो वैचारिक असावा. मात्र आज वैचारिकताच पाळली जात नाही. सत्ताधार्यांनी भावनिक मुद्दे उपस्थित करून तरूणांना भडकावण्याचे प्रयत्न चालवले आहेत.ते विकासाच्या मुद्दयावर बोलायला तयार नाहीत.
आज देशात सर्वत्र बेकारी, बेरोजगारी वाढली आहे. चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे देशात मंदीची लाट आली आहे. तरूणांच्या हाताला काम नाही.
उद्योगधंदे बंद पडत आहेत. विंरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत. आजचा मेळावा हा दिशा देणारा आहे. अनेकांनी मी दक्षिणेतुनच विधानसभेची निवडणुक लढवावी असे मत व्यक्त केले आहे. या मताचा आदर राखला जाईल असे कार्यकर्त्यांना त्यांनी अश्वासित केले.
यावेळी अजित पाटील चिखलीकर यांच्यासह कराड शहर तालुक्यातील अनेक पदाधिकारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
आ.चव्हाण यांनी दक्षिणेतूनच निवडणुक लढवावी; कार्यकर्त्यांचा आग्रह
RELATED ARTICLES