सांगोला : विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे शिक्षक प्रबोधिनी समितीच्या वतीने व्याख्यानाच्या सत्रात भारतीय संघराज्य प्रणाली या विषयावर राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे यांनी आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे होते.
प्रा. धैर्यशील भंडारे म्हणाले, मभारतीय राज्यघटनेच्या पहिल्या कलमानुसार संघराज्य प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. संघराज्य असा प्रत्यक्ष उल्लेख न करता इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे.
1935 च्या कायद्यानुसार संघराज्य प्रणालीचा स्वीकार करण्यात आला होता त्यातील काही तरतुदीत बदल करून तिचा पुढे भारतीय संविधानात अंतर्भाव करण्यात आला. भारत हा एकसंघ असून प्रशासकीय सोयीसाठी विविध घटक राज्यात विभाजन केले आहे. लिखित संविधान, केंद्र व राज्य अशी कार्य विभागणी आणि सर्वोच्च न्यायालय ही संघराज्याची वैशिष्ट्ये असून संघराज्य व्यवस्थेच्या स्वीकृतीमुळेच भारत एकसंघ राहिला आहे असे ते म्हणाले.
भारतातील सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे संघराज्य प्रणालीचा स्वीकार केला गेला. कुठल्याही माणसाचा दोन तीन विषयावर सखोल अभ्यास असतो. त्याहून जास्त असत नाही. त्यामुळे अशा कार्यक्रमधून आपले ज्ञान वृध्दिंगत होते म्हणून असे कार्यक्रम सातत्याने व्हावेत आशा भावना मा. प्राचार्य डॉ. साहेबराव जुंदळे यांनी व्यक्त केल्या.
शेवटी सर्वांचे आभार समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सुशील रणदिवे यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
संघराज्य व्यवस्थेच्या स्वीकृतीमुळेच भारत एकसंघ : प्रा. धैर्यशील भंडारे
RELATED ARTICLES